ल्हासा, (तिबेट) :– चीनने बळकावलेल्या तिबेटमध्ये बनावट आरोपांखाली स्थानिक तिबेटींचा छळ सुरू आहे. तिबेटी संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे. चिनी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे तिबेटी नागरिकांना अत्याचारांना सामोरे जावे लागते आहे. या यातनांचे व्हिडीओ तिबेटी नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. “व्हॉईस अगेन्स्ट ऍट्रॉसिटीज’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
चीनने 1950 साली तिबेटचा ताबा घेतला. तेंव्हापासून स्थानिक तिबेटी नागरिक आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करत आहेत. तिबेटवरील चिनी अत्याचारांच्या कहाण्या जगासमोर आल्या आहेत. मात्र अलिकडच्या काळात या अत्याचारांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. आता निरपराध बौद्ध भिक्षुंनाही आपल्या धार्मिक परंपरा अनुसरता येत नाहीत. आता चिनी अधिकाऱ्यांकडून बौद्ध भिक्षुंचा धार्मिक पेहराव असलेले झगे उतरवले जाऊ लागले आहेत. अनेक भिक्षुंना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. अशा कैद्यांची माहिती त्यांच्या कुटुंबियांपासून दडवून ठेवली जात आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.
तिबेटमधील गेशे तेनसिन पेलसॅंग नावाचे धर्मगुरू पूर्व तिबेटमधील ड्रॅको प्रांतात राजकीय स्वातंत्र्यासाठी आंदोलन करत होते. त्यांना 2012 पासून 2018 पर्यंत खोट्या आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगात त्यांना अतिशय अमानवी स्थितीत ठेवण्यात आले होते. त्यांना योग्य वैद्यकीय सुविधाही दिल्या गेल्या नव्हत्या. तुरुंगात असताना झालेल्या मारहाणीमुळे 2018 मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांना स्वतःच्या पायावर उभेही राहता येऊ शकत नव्हते. दलाई लामांचे समर्थन करणाऱ्या धर्मगुरुंवर बारीक लक्ष ठेवले जाते. गेशे यांना काही दिवसांपूर्वी भारतात पाठवण्यात आले आहे.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
सिचुआन प्रांतातील कीर्ती मठातील दोन भिक्षू रचुंग गेंडुन आणि सोनम ग्यात्सो यांना चेंगडूच्या जवळ असलेल्या सिचुआन प्रांतातील मेन्यांग तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दलाई लामांचे समर्थन रोखण्यासाठी चीनकडून “देशभक्ती’चा कार्यक्रम राबवला जातो. या अंतर्गत या दोन्ही भिक्षुंना ही शिक्षा देण्यात आली आहे. यातील रचुंग गेंडुन यांना 2001 साली तर सोनम ग्यात्सो यांना 2021 साली तायात घेण्यात आले. सोनम यांचा ठावठिकाणा अजूनही अज्ञात आहे.