Gopichand Padalkar : “ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!” पडळकरांचा विरोधकांवर पलटवार
Gopichand Padalkar : सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानभवन परिसरात माध्यामांशी संवाद साधताना पडळकरांनी हे विधान केलं आहे.

Gopichand Padalkar : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलं असून, विरोधी आणि सत्ताधारी पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे समर्थन करत विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.
“ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानभवन परिसरात माध्यामांशी संवाद साधताना पडळकरांनी हे विधान केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना पडळकर म्हणाले की, विदर्भातील वास्तव परिस्थितीची माहिती नसलेले आणि त्या भागासाठी कोणतेही ठोस काम न केलेले काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. “फडणवीसांवर टीका करणं हे त्यांच्या अज्ञानाचं द्योतक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा : Awarapan 2 : इम्राम हाश्मी आणि दिशा पटानीची रोमँटिक कमेस्ट्री! आवारापन 2 चं पहिलं गाण रिलीज
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी सडकून टीका केली. “गेल्या सहा दशकांत विदर्भाचा विकासातील अनुशेष दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांना गती देत हा अनुशेष कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली,” असा दावाही पडळकर यांनी केला. “केवळ राजकारण न करता महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले? (Gopichand Padalkar)
“ज्या लोकांना अक्कल नाही शेंबूड काढायची…. ते देवाभाऊंवर बोलतात… विदर्भातील प्रश्न काय आहेत त्याची अक्कल नाही, कुठं अजून कुठलं काम केलं नाही, ही लोकं देवाभाऊंवर बोलतात हे यांचं अज्ञात आहे.

Gopichand Padalkar : “ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!” पडळकरांचा विरोधकांवर पलटवार
पुढे बोलताना पडळकरांनी “त्यानं आणि त्याच्या आजोबाने विकासाचं वीट कुठं महाराष्ट्रात लावलीये आहे का? अशी घणाघाती टीका ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली. विकासाचं त्याला काय माहितीये हे इन्फ्रास्ट्रचर कुठे चाललेय… कारखाना चोरण्याइतकी सोपं नाही, असेही पडळकर म्हणाले. (Gopichand Padalkar)
मुंबई-पुणे मिसिंगलिंकवर दरड कोसळ्याची घटना घडली होती. या घटनेवरुन विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. त्यावरुन राजकारण नंतर करावं याअगोदर याबद्दल याची माहिती घ्यावी, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या तापणार असल्याची शक्यता असून त्यांच्या विधानावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Ektanagari : एकतानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; क्षेत्रीय कार्यालयाकडून दूर्लक्ष





