‘हिजाब घातल्यामुळे ‘या’ प्राचार्याने २८ विद्यार्थिनींना वर्गातून काढले होते’ आता कर्नाटक सरकारने घेतला, ‘मोठा निर्णय’

Karnataka News | कर्नाटक शिक्षण विभागाने रामकृष्ण बी.जी. यांना जाहीर केलेला सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार थांबवला आहे. 2021-22 मध्ये हिजाबच्या वादात डोक्यावर स्कार्फ घातलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उन्हात उभे केल्याचा रामकृष्ण बी.जी यांच्यावर करण्यात आला होता.
दरम्यान, कुंदापूर, उडुपी येथील शासकीय प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजचे प्राचार्य रामकृष्ण बीजी यांनी माध्यमांशी बोलतांना याबाबत सांगितले, ते म्हणाले,’हा पुरस्कार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला नाही.’
शिक्षण विभागाने निवेदन जारी केले
तांत्रिक अडचणींमुळे ‘उशीर’ होऊ शकतो, असे शिक्षण विभागाने सांगितले, मात्र त्यामागील कारण सांगितले नाही. कुंदापूरचे रामकृष्ण आणि ए रामा गौडा या दोन मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने मंगळवारी हा पुरस्कार जाहीर केला. त्याच वेळी, उडुपीमधील पीयू विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला की त्यांना पुरस्काराशी संबंधित कोणत्याही वादाची माहिती नाही.
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने आक्षेप व्यक्त केला
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (SDPI) कुंदापूरच्या रामकृष्ण यांचे नाव हिजाबच्या वादात दिसल्याने त्यांच्या नावावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. या वादानंतर रामकृष्ण यांनी दावा केला होता की, त्यांना अज्ञात क्रमांकांवरून द्वेषपूर्ण संदेश येत आहेत. डिसेंबर 2021 मध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब संदर्भात वाद झाला होता. येथे हिजाब परिधान केल्यामुळे किमान 28 विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले.
एसडीपीआय दक्षिण कन्नडचे अध्यक्ष अन्वर सदाथ बजाथूर यांनी याबाबत लिहिले की, ‘ज्या प्राचार्याने मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब घातल्यामुळे अनेक महिने बाहेर उन्हात उभे केले, त्यांना प्राचार्य होण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेस सरकारने राज्य पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन का केले?’ असं म्हणत त्यांनी प्रश्नही उपस्थित केले आहे.





