Maharashtra Politics : “त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे…”; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पवारांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव, वाचा….

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवारांची नावे अंतिम करण्यात गुंतले आहेत. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या निवडणुकीत दोन्ही गटात मिळून चार पक्ष होते त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंडखोरीमुळे आणखी दोन पक्ष उदयाला आले आहेत. महायुतीत 3 आणि महाविकास आघाडीत 3 असे एकूण मुख्य सहा पक्ष निवडणुक मैदानात आहेत.
पक्ष जास्त असल्यामुळे त्यांना जागावाटप करताना प्रमुख नेत्यांची मोठी कसरत होत आहे. असं असलं तरी आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असणार? याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जाते आहेत. या संदर्भातील नवीन बातम्या देखील रोज समोर येतात.
राहुल गांधी सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करू इच्छित नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असंच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केल्याचे त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. मात्र काँग्रेसला याला विरोध असल्याचा आदेश रावल यांनी म्हटले आहे. मात्र, अश्यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावर मोठं विधान केलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “आमच्यासाठी विषय संपला आहे. आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेते रिंगणात आहेत. याबाबत ते म्हणाले,
‘यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीचा निकाल लागू द्या, त्यानंतर या विषयावर बोलता येईल. तसंच, जयंत पाटलांकडे मोठी जबाबदारी आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे आता शरद पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय निघतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.





