“..त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो” संत तुकाराम महाराजांसंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत बागेश्वर महाराजांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज चांगलेच चर्चेत आहेत. सुरुवातीला धीरेंद्र शास्त्री यांना मिळालेल्या आव्हानामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर ‘संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’ असं धक्कादायक विधान शास्त्रींनीं केलं होत. म्हणून त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. यानंतर बागेश्वर महाराजांनी आपण केलेले विधान मागे घेत असल्याचे म्हंटले आहे.
शास्त्री जिथं दिसतील तिथं त्यांना ठोका अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देत संताप व्यक्त केला होता.इतर राजकीय नेत्यांनी देखील बागेश्वर बाबांच्या विधानाबाबत संताप व्यक्त केला होता. “तुकाराम महाराज हे महान संत आहेत. मी एका पुस्तकात त्यांच्या संबंधी वाचल होत.त्यांच्या पत्नी विचित्र स्वभावाच्या होत्या,मी त्यांच्या उसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती” असं बागेश्वर महाराज यावेळी म्हणले.
“तुकाराम महाराजांना एकदा त्यांच्या पत्नीने ऊस आणायला लावला. परंतु आणलेल्या उसानेच त्यांच्या पत्नी त्यांना मारतात आणि उसाचे दोन तुकडे होतात ही गोष्ट मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता असं बागेश्वर महाराज म्हणतात. तसेच आपल्या कहाणीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या,त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो” असं बागेश्वर महाराज यावेळी म्हणालेत.
काय होत वादग्रस्त विधान
“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? यावर तुकोबा म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज उर्फ बागेश्वर महाराज म्हणाले होते.





