मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कार्यालयावर महिन्याभरापूर्वी मुंबई महापालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करत शिवसेनेवर सडकून टीका केली. तेव्हापासून बीएमसी, शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, कंगना आणि बीएमसी या वादात आता पर्यंत पालिकेला 82 लाख 50 हजारांचा भुर्दंड सोसावा लागल्याची माहिती समोर येते आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, “पेंग्विन आणि कंगना रनौतच्या प्रकरणातील वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील”. असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
Wow! Mumbaikers pay tax for..
1.)Penguins
2.)lawyers for Kanganas caseWhat else is left???
Inke baccho ki shaadi abhi humare hi paiso se hogi lagta hai!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 28, 2020
कंगना आणि बीएमसी या संपूर्ण प्रकरणात पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत तब्ब्ल 82 लाख 50 हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत 11 वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या 7 लाख 50 हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे. याच पार्श्ववभूमीवर कंगणाने सुद्धा ट्विट करत बीएमसी आणि शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत.
Muncipal Corporation so far spent 82 lakhs on lawyer for illegally demolition of my house, papa’s Pappu spending public money to tease a girl, this is where Maharashtra stands today, very unfortunate. https://t.co/v6gQFJqdvL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 28, 2020