मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. त्यांनी हा प्रकार अपमानास्पद असल्याचे सांगत राज्यपालांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
भाजप मंत्र्याच्या घरी श्रीलंका स्टाईल आंदोलन; निवासस्थानी घुसून…
सतेज पाटील म्हणाले, “राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद असून वारंवार महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, क्रांतिकारक तसेच सर्वसामान्य मराठी माणसांचा वारंवार अपमान करत असून आम्ही त्यांचा तीव्र निषेध करत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले असून लाखो मराठी माणसांच्या कर्तृत्वाने हे राज्य देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम करत आले. देशाची ‘आर्थिक राजधानी मुंबई’संदर्भात अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी तत्काळ जाहीर माफी मागावी. लाखो लोकांना आधार देणारी ही ‘आपली मुंबई’ आहे.”
“अडचणीत असलेला माणूस…” साश्रू नयनांनी खोतकरांनी जाहीर केला एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय