भांडणाने घेतला दोघांचाही जीव! तिच्या पाठोपाठ त्यानेही घेतली कालव्यात उडी, पुणे जिल्ह्यातील या भागात नेमकं काय घडलं?

Pune News | पुण्यातील डिंंभे धरणाच्या डाव्या कालव्यात विठ्ठलवाडी टाकेवाडी जवळ एक धक्कादायक आणि मनाला चटाका लावणारी घटना घडली आहे. मामाच्या मुलीला सोबत घेऊन गेलेल्या तरुणीवरने प्रेयकरासोबत झालेल्या वादानंतर थेट कालव्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तिच्या प्रियकरानेही कालव्यात उडी घेतली. कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडाळगे अशी कालव्यात उडी मारलेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही पोहता येत असल्याने दोघेही बाहेर येतील, असे कविताच्या मामाची मुलीला वाटले पण दोघेही बाहेर आले नाहीत. त्यानंतर ती भेदरलेल्या अवस्थेत तिथच बसून होती.
नेमकी घटना कशी घडली?
टाकेवाडी डाव्या कालव्या जवळ आल्यानंतर कविता पारधी व पप्पू खंडागळे या दोघांमध्ये कशाच्या तरी निमित्ताने भांडण झाले. त्यावेळी प्रथम कविता पारधी हिने कालव्यातील पाण्यामध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पप्पू खंडागळे यांनी उडी मारली. दोघांनाही पोहोता येत असल्याने ते बाहेर येतील, असे दिव्या काळे हिला वाटले. परंतु दोघेही काही वेळानंतर दिसेनासे झाल्यानंतर दिव्या काळे ही घाबरून रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात येवून बसली. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आले असता त्यांना तेथे मुलगी दिसली. तिला तिचे नाव विचारले असता दिव्या काळे असे माझे नाव असून तिने घडलेला प्रकार सांगितला.
पोलीस पाटील उल्हास चिखले, उपसरपंच समीर काळे, ग्रामस्थ राहुल नंदराम चिखले, भानुदास चिखले, रवींद्र मोतीलाल काळे, अनिल दगडू जाधव, शांताराम शंकर चिखले, विशाल रामदास चिखले यांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरात डाव्या कालव्याची पाहणी केली. परंतु पारधी आणि खंडागळे आढळून आले नाहीत. कविता पारधी आणि पप्पू खंडागळे यांनी कालव्यात कोणत्या कारणावरून उडी मारली याबाबत पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा सुरु होती. पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना झालेली घटना कळवली. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आर. मांडवे, संदीप कारभळ, पोलीस हवालदार संजय नाडेकर आणि पोलीस योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.





