काही कांद्यांना निर्यात बंदीतून वगळले
Updated On:

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गेल्या पंधरवड्यामध्ये सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर सरसकट बंदी घातली होती. मात्र, आता बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे.
31 मार्च 2021 पर्यंत बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम कांद्याची 10 दहा हजार टनांपर्यंत निर्यात करता येईल. या दोन्ही कांद्याची निर्यात फक्त चेन्नई बंदरातून करता येणार आहे.





