Indian families Gold: भारतीय नागरिकांकडे असलेला सुवर्ण साठा जगातील सर्वात मोठ्या दहा देशाच्या रिझर्व बँकापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे 2024 ते 26 या कालावधीमध्ये सोन्याच्या दरात अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकाकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य प्रचंड वाढले. या सोन्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सदुपयोग करण्याकरिता नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने व्यक्त केले आहे. असोचेमच्या मूल्यांकनानुसार भारतीय नागरिकाकडे सध्या तब्बल 25 ते 35 हजार टन सोने दागिने आणि बिस्किटाच्या स्वरूपात आहे. 35 हजार टन सोन्याची सध्याच्या बाजार भासानुसार किंमत 5 लाख कोटी डॉलर म्हणजे 500 लाख कोटी रुपये इतकी होते. सध्याच्या मूल्यांकनुसार भारतीय अर्थव्यवस्था सर्वसाधारणपणे चार लाख कोटी डॉलरचे असल्याचे समजले जाते. म्हणजे एकूण भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय कडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य जवळजवळ सव्वा पटीने जास्त आहे. भारताकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य चीन आणि अमेरिका वगळता जगातील इतर कोणत्याही देशाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे. जर हे सोने बँकिंग व्यवस्थेत आले किंवा उद्योग व्यवसायात गुंतवले गेले तर त्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 880.3 टन सोने आहे. अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेकडे 8,133 टन सोने आहे. इतर काही श्रीमंत देशाकडे भारतीय रिझर्व्ह बँकेपेक्षा जास्त सोने आहे. भारतीयांची सोन्यातील गुंतवणूक एकूण बँकातील ठेवी आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षाही जास्त असल्याचे बोलले जाते. मात्र भारतीयकडे असलेल्या सोन्याचा उत्पादक उपयोग होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असते.