SharadenduTiwari : जिद्द असावी तर अशी! ७ वेळा अपयश आल्यानंतरही सोडलं नाही स्वप्न; ४६ लाखांची नोकरी सोडून लष्करात दाखल
SharadenduTiwari : ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’द्वारे निवड

SharadenduTiwari : आजच्या काळात यशाची व्याख्या अनेकदा मोठा पगार, आलिशान जीवनशैली, परदेशातील नोकरी आणि सुरक्षित भविष्य याभोवती फिरताना दिसते. एखाद्याला लाखोंचे पॅकेज मिळाले की त्याने आयुष्यात मोठे यश मिळवले, असे सहज मानले जाते. पण यशाची खरी किंमत फक्त पैशांत मोजता येते का? हा प्रश्न लखनौच्या एका तरुणाच्या कामगिरीनंतर पडतो.
ॲमेझॉन कंपनीतील वार्षिक तब्बल ४६ लाख रुपयांच्या पॅकेजवर पाणी सोडून २७ वर्षीय शारदेंदू तिवारी भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमधून ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.
शारदेंदू यांच्यासाठी लष्करातील प्रवेश सोपा नव्हता. तब्बल ७ वेळा त्यांना निवड प्रक्रियेत अपयशाचा सामना करावा लागला. मात्र हार न मानणाऱ्या शारदेंदू यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांची ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’द्वारे निवड झाली. गया येथील प्रशिक्षणादरम्यान, त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व कौशल्यामुळे त्यांना अकादमीतील सर्वोच्च कॅडेट पदांपैकी एक असलेले वरिष्ठ अवर अधिकारी हे पद मिळाले. SharadenduTiwari
कोण आहेत शारदेंदू तिवारी?
शारदेंदू यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पिपरगाव येथील आहे. काही वर्षांपूर्वी ते लखनौमधील नीलमाथा येथे स्थायिक झाले. त्यांचे शालेय शिक्षण हरयाणातील चांदीमंदिर येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगड येथून माहिती तंत्रज्ञान शाखेत बीई आणि त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉर्मेशन सिक्युरिटी विषयात एम.टेक पूर्ण केले. शारदेंदू यांना बास्केटबॉल आणि टेबल टेनिस खेळण्याची आवड आहे. SharadenduTiwari
शारदेंदू यांचे वडील मानद कॅप्टन राजकुमार तिवारी यांनी आर्मी सर्व्हिस कोअरमध्ये (ASC) तब्बल ३६ वर्षे सेवा बजावली आहे. वडिलांच्या लष्करी सेवेचा शारदेंदू यांच्यावर बालपणापासूनच खोल प्रभाव होता. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत, शारदेंदू हे राष्ट्रसेवेचा वारसा पुढे चालवेल.
लष्कराची निवड करण्यापूर्वी त्यांनी केवळ अॅमेझॉनच नव्हे, तर प्रसिद्ध एरोस्पेस कंपनी ‘एअरबस’कडून आलेली नोकरीची मोठी ऑफरही नाकारली होती. भारतीय लष्कराच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शरदेंदू तिवारीची यशोगाथा शेअर करण्यात आली आहे.
आज अनेक तरुण एखाद्या परीक्षेत एकदा अपयशी झाले की निराश होतात. एखादी नोकरी मिळाली नाही, अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा एखादी संधी हातातून गेली की आपण मागे पडलो, अशी भावना निर्माण होते. पण तिवारींच्या प्रवासाकडे पाहिले तर परिस्थिती वेगळी दिसते. त्यांच्याकडे चांगली नोकरी होती, उत्तम शैक्षणिक पात्रता होती, तरीही मनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि अखेर यश मिळवलं. त्यांची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. SharadenduTiwari
हेही वाचा:





