Rajnath Singh : आजच्या काळातील युद्धे केवळ सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत; तर राष्ट्रीय सुरक्षेच्या कक्षेत (Rajnath Singh) आता आर्थिक, डिजिटल, ऊर्जा आणि अगदी अन्न सुरक्षेचाही समावेश झाला आहे. जागरुक आणि सुसज्ज नागरिकांच्या पाठिंब्यावर त्या देशाचे लष्कर मजबूत रहात असते. भारताला अशा जागरुक नागरिकांची गरज आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केले आहे. उत्तराखंडमधील घोराखाल येथील सैनिक शाळेच्या सुवर्णमहोत्सवी स्थापना दिन सोहळ्यानिमित्त दिलेल्या भाषणात राजनाथ सिंह बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, संघर्षाचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात बदलले आहे; राष्ट्रे आता आर्थिक, सायबर, अंतराळ आणि माहिती युद्धाच्या धोक्यांना सामोरे जात आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सदैव सतर्क आणि सज्ज राहणे अत्यंत आवश्यक बनले आहे. Rajnath Singh पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी केलेल्या प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. नागरिकांनी—विशेषतः तरुणांनी—शिस्त आणि दृढनिश्चयाच्या माध्यमातून आपली मानसिक कणखरता आणि बौद्धिक स्पष्टता विकसित करणे गरजेचे आहे; जेणेकरून राष्ट्राला सर्व आव्हानांचा सामना करण्यास मदत होईल. अधिक सैनिक शाळा हव्यात युवकांमध्ये राष्ट्रनिर्माणाशी संबंधित मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या सरकारी उपक्रमांवर प्रकाश टाकताना, सिंह यांनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर आधारित देशभरात १०० नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या अलीकडील निर्णयाचा उल्लेख केला. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेमधील संधींचा विस्तार करण्याबाबतही भाष्य केले आणि नमूद केले की, पूर्वी एनसीसीची छात्र सामावून घेण्याची क्षमता १७ लाख इतकी होती; आता ती वाढवून २० लाख करण्यात आली आहे. याशिवाय अजून सैनिक शाळांची देशाला (Rajnath Singh) गरज आहे. सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देणेही समर्थनीय आहे.