Telangana Election Result 2023 : तेलंगणात रेवंत रेड्डी बनणार मुख्यमंत्री? अभाविप ते काँग्रेस असा आहे प्रवास…

Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार येथे काँग्रेसने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत काँग्रेसने 65 जागांवर आघाडीवर घेतली आहे. यानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून येथे सरकार स्थापनेसाठी 60 टप्पा गाठावा लागणार आहे. त्यामळे आता तेलंगणात काँग्रेसचे बहुमत निश्चित झाल्याचे स्पष्ट होत आहे.
2023 च्या विधानसभा निवडणुकीत BRS ला काँग्रेस पक्षाने धोबीपछाड करून सोडले आहे.काँग्रेसच्या या दमदार कामगिरीनंतर आता
मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघात तगडी टक्कर दिल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना पिछाडीवर टाकले आहे. हा CM केसीआर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रेवंत रेड्डी कोण आहेत ?
तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. काँग्रेस पक्ष तेलंगणात सत्तेत आला तर रेवंत रेड्डी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे मानले जात आहे. रेवंत रेड्डी हे 17व्या लोकसभेचे सदस्य आहेत. मल्काजगिरी मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी संसद गाठली. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता.
2014 सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर 2017मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना 2021 मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले. रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. पुढे 2007 साली रेड्डी यांना अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाली. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
1999 मध्ये त्यांनी कोडाड मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर चेंदर राव वेनपल्ली यांचा 7309 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2004 मध्येही त्यांनी ही जागा जिंकली होती. 2009 मध्ये त्यांची जागा बदलली पण त्यांनी विजयाचा सिलसिला कायम ठेवला आणि हुजूरनगर मतदारसंघातून आमदार झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्ये त्यांना नल्लारी किरण कुमार रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले.
कोणते नेते आहेत मुख्यमंत्री चेहऱ्यांसाठी आघाडीवर?
रेवंत रेड्डी यांच्यासह के. जना रेड्डी, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, मल्लू भाटी विक्रमार्क, टी जीवन रेड्डी, रेणुका चौधरी आणि दामोदर राजनरसिम्हा यांची नावेही संभाव्य मुख्यमंत्री चेहऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत.





