‘कोण आहेत राहुल गांधी…? पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?’ ; मोदींना चर्चेसाठी आमंत्रित केल्याने भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

Tejasvi Surya । काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या चर्चेच्या आव्हानानंतर भाजप काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या भाजप लोकसभा उमेदवार स्मृती इराणी यांनी,’राहुल गांधींमध्ये त्यांच्या तथाकथित महालात भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. बढाई मारणे टाळा. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत समान पातळीवर चर्चा करायची आहे, त्यांना माझा सवाल आहे की, ‘ते इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?” असेही त्यांनी म्हटले. त्यात भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या यांनी देखील राहुल गांधींवर टीका केलीय.
कोण आहेत राहुल गांधी ? Tejasvi Surya ।
भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी,”राहुल गांधी कोण आहेत ? पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी चर्चा का करावी? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, इंडिया आघाडीची चर्चा तर सोडा. आधी त्यांनी स्वत:ला काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे, त्यांच्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतील असे सांगावे. नंतर पंतप्रधानांना चर्चेसाठी बोलावावे. असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच, “तोपर्यंत आम्ही आमच्या बीजेवायएमचे प्रवक्ते कोणत्याही वादविवादात त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तैनात करण्यास तयार आहोत.
भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, ‘प्रासंगिकतेसाठी हताश, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर वादविवाद चांगला आहे. पण सध्याच्या पंतप्रधानांनी राहुल गांधींशी वाद का करावा? ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत किंवा INDI आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत. काँग्रेसने राहुल गांधींना पुन्हा लाँच करण्यासाठी ब्रँड मोदी वापरणे बंद करावे.” असा सल्ला दिलाय.
काय म्हणाले होते राहुल गांधी? Tejasvi Surya ।
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना, निरोगी लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी एका व्यासपीठावरून देशासमोर त्यांचे व्हिजन मांडणे हा सकारात्मक उपक्रम असेल. काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारते. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे, अशी देशाची अपेक्षा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन माजी न्यायाधीश आणि एन राम यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चेसाठी व्यासपीठावर आमंत्रित केले होते.





