Team India – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू नुकतेच बांगलादेशच्या दौऱ्यावरून मायदेशात परतले आहेत. या दौऱ्यात भारताने ३ एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ अशी गमावली होती. त्यानंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने यजमानांना मात देत २-० अशी क्लीन स्वीप दिली. मात्र, या दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक स्वरूपाची पाहायला मिळाली. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारताला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत.
#RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला
श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. जाहीर झालेल्या संघांतील खेळाडूंची नावे पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसलाय. कारण यावेळी बीसीसीआयने संघ निवड करताना या दोन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारीला मुंबईतील सामन्यांपासून टी-२० मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर १० जानेवारीला गुवाहाटीतील सामन्यापासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या दोन्ही मालिकांसाठी शिखर धवन आणि ऋषभ पंत या दोघांनाही संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या दोघांनीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रोहित उपलब्ध नसताना शिखर धवनला एकदिवसीयचे कर्णधारपद दिले जाते. आता एकदिवसीय विश्वचषकाचे लक्ष्य समोर असताना त्याला संघाबाहेर काढले जात आहे.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
याअगोदर कसोटी क्रिकेट त्यानंतर टी-२० फॉरमॅट आणि आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही त्याला डच्चू देण्यात आलाय. या अनुभवी सलामीवीराची कारकीर्द आता संपुष्टात आली आहे, असा सूर चाहत्यांमध्ये निघत आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत नसलेल्या धवनने एकदिवसीय क्रिकेटवरच लक्ष्य द्यायचे, असे ठरवले होते. पण या फॉरमॅटमधूनही त्याला वगळण्यात आले आहे. बीसीसीआय धवनच्या जागी ईशान किशन आणि शुबमन गिल यांना संधी देण्याच्या बेतात असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी धवनला वगळल्या जाण्याच्या निर्णयावरून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.
#TeamIndia squad for three-match ODI series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/XlilZYQWX2
— BCCI (@BCCI) December 27, 2022