Tanaji Sawant controversial statements । महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक निर्णयांना कामांना स्थगिती देऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणीसांनी सत्तेतील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यामुळे सत्तेतील मित्र पक्ष नाराज होतानाही दिसून येत आहे. त्यात खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान,आता या दोघांच्या नाराजीच्या झळा या त्यांच्या पक्षातील नेत्यांपर्यंत पोहचत असल्याचे दिसत आहे. त्यात अत्यंत ताजे उदाहरण म्हणजे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे प्रकरण. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण तर न्यायप्रविष्ट असून त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील कामाला फडणवीस सरकारने स्थगिती दिली असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील कामात अनियमितता मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयाच्या साफसफाईसाठी पाच वर्षांत ३,१९० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, पण त्यावर स्थगिती देण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र अशी स्थगिती आपण दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण ज्या कंत्राटाची एवढी चर्चा करण्यात येत होती. ते म्हणजे सर्व शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे यांच्या साफसफाईचे हे कंत्राट होते. यासाठी प्रतिवर्षी ६३८ कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ३,१९० कोटी रुपयांचे कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला दिले होते. त्यावेळी शिंदेसेनेचे तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्यमंत्री होते. सूत्रांनी सांगितले की, आर्थिक तरतूद नसताना या कंत्राटासाठीची निविदा काढून मंजूरही झाली. असे कंत्राट नियमात बसणारे नाही, अशी भूमिका आरोग्य विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडली होती. मात्र ती मान्य न करता कंत्राट देण्यात आले. याच कंत्राटावरून तानाजी सावंत हे गोत्यात आल्याचे म्हटले जात आहे. तस पाहिलं तर तानाजी सावंत हे मागच्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येत आहे. पण तानाजी सावंत आणि वाद हे काही नवीन नाही. आताच भ्रष्टाचाराचा विषयच नाही तर तानाजी सावंत हे त्यांच्या वक्तव्यांनी नेहमीच गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले. तानाजी सावंत यांच्या वादाची मालिका काही कमी नाही. खेकडा, हाफकिन आणि मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्यांनी ते विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. तानाजी सावंतांनी केलेली वादग्रस्त विधाने Tanaji Sawant controversial statements । * फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण फुटीबाबत आपलं मत व्यक्त करतांना त्यांनी खेकड्यांचा केलेला उल्लेख, पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पकडण्यात आलेले डासांची संख्येवरून विरोधकांनी उडवलेली त्यांची खिल्ली, त्यानंतर पुण्यातील ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’ या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा आणि मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांची चांगलीच फजिती झाली होती. त्यामुळे सावंतांना जरा जपून, अशी म्हणायची वेळ मुख्यमंत्री शिंदेंवर आली होती. * मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनीही बंड केलं त्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंता हे आघाडीवर होते. बंडखोरीनंतर सावंतांनी सातत्याने ‘मातोश्री’ आणि ठाकरे परिवारावर कठोर शब्द टीका केली आहे. त्यामुळे त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. * शिंदेच्या काळात उस्मानाबाद येथे हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रे दरम्यान बोलताना मराठा समाजाला आरक्षणाची खाज आहे असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. यामुळे त्यांना जाहीर माफी मागण्याची वेळही त्यांच्यावर आली. सावंत यांचा हा पहिलाच वाद नसून याआधीही त्यांनी तिवरे धरण फुटल्यावर ते खेकड्यांमुळे फुटलं असाव, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यावेळीही त्यांना विरोधकांच्या आणि सोशल मीडियावर टिकेच धनी व्हावं लागलं होतं. * तर सगळ्यात कहर म्हणजे शिंदेच्या काळात आरोग्य मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर ‘हाफकीन’ नावाच्या व्यक्तीकडून औषधी घेऊ नका,असे वक्तव्य करून स्वतःचे अज्ञान उघड केले होते. तसेच या वक्तव्यावरून उत्तरं देतांना त्यांची दमछाक झाली होती. त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे सावंत यांना देता न आल्याने प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. यावेळी किती डास पकडण्यात आली त्यातील मादी आणि नर किती यावरूनही त्यांची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. * एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत. मागे त्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत कॅबिनेट बैठकीत बसल्यानंतर आपल्या उलट्यांसारखे होते असे वक्तव् करुन खळबळ उडवून दिली होती. आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आमचे आणि राष्ट्रवादीचे विचार वेगळे असल्याने घुसमट होते अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य खूपच गाजले होते. तानाजी सांवत यांनी हाफकीन इन्स्टिट्यूटला व्यक्ती म्हणून संबोधल्याचा वादही खूप गाजला. एकदा तर त्यांनी भाषणात मी महाराष्ट्राला भिकारी बनविन असे वक्तव्य केले होते. वाद आणि तानाजी सावंत यांचे नाते कायम आहे. दरम्यान, सध्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांना याच वादग्रस्त विधाने आणि कामातील अनियमितता याचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. कारण सध्याच्या सरकारमध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. याचाच रोष त्यांच्या मनात असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाच्या बातम्यांनी एकच गोंधळ उडवून दिला होता. मात्र अपहरणाचा बनाव करत मुलगा लाखो रुपये घेऊन परदेशवारी करण्यासाठी निघाला होता मात्र वेळीच पोलिसांनी हा सगळा बनाव उघड करून प्रकरण मार्गी लावले. परंतु , यासगळ्यात पुन्हा एकदा सावंतांच्या नाराजीमुळे हे सगळं करण्यात आले असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना तानाजी सावंतांनी “घोटाळा वाटतो ना, मग चौकशी करा, असे माझे आव्हान आहे. एक पैसाही कंत्राटदार कंपनीला दिला नाही, मग सरकारचे नुकसान झाले कुठे? चढ्या दराने कंत्राट दिले म्हणता मग सामाजिक न्याय अन् वैद्यकीय शिक्षण विभागाने त्याच दराने कंत्राट दिले. सरकारी रुग्णालये स्वच्छ असावीत ही भावना ठेवून निर्णय घेणे अयोग्य कसे? तेही सांगा. स्वच्छतेसाठी मेकॅनाईज्ड् सीस्टिमची शिफारस विभागाने केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निविदा प्रक्रिया राबविली.” असे म्हटले आहे. कोण आहेत तानाजी सावंत? Tanaji Sawant controversial statements । तानाजी सावंत हे आधी बांधकाम व्यावसायिक असून नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविली होती. त्यांचा जन्म १ जून १९६४ साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला आहे. त्यांचं मूळ गाव हे सोलापूर आहे. त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठातून सिव्हील इंजिनियरिंग केले आहे. त्यानंतर त्यांनी प्राध्यापकी केली आङे. त्यांनी ९० च्या दशकात कन्स्ट्रक्शन उद्योगात प्रवेश केला. साल १९९८ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड़ क्षेत्रात जेएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर संपू्र्ण महाराष्ट्रात सहा महाविद्यालये काढली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी राजकीय जीवनाचा प्रवास सुरु केला. ११५.४५ कोटींची संपत्ती आधी तानाजी सावंत अखंड शिवसेनेत असताना विधानपरिषदेचे आमदार बनले. त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती ११५.४५ कोटी असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी विधान परिषदेवर निवडून आलेल्या सर्व आमदारात ते सर्वात श्रीमंत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये जल आणि माती संरक्षण मंत्री बनले. साल २०१९ च्या विधानसभा निवडणूकांत धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेच्या जागेवरुन निवडून आले. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा सावंत उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्या आणि शिंदेंना जाऊन मिळणाऱ्या पहिल्या आमदारांत होते. जून २०२२ मध्ये भाजपाच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या पावणे दोन वर्षांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री बनले. यंदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये त्यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे डच्चू मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.