‘सूर्यवंशम’मध्ये आजोबांना विषारी खीर देणारा ‘छोटा भानू प्रताप’ सध्या काय करतो? आता दिसतोय खूपच हँडसम

Suryavansham | Ananda Vardhan | amitabh bachchan : बॉलिवूडचे शेहनाशह अमिताभ बच्चन यांनी आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या एका चित्रपटाची चर्चा आजची पिढीदेखील करताना दिसते. तो चित्रपट म्हणजे ‘सुर्यवंशम’. 21 मे 1999 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सात कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी 12 कोटी 65 हजारांचा गल्ला जमवला होता.
अमिताभ बच्चन यांचा चित्रपटात डबल रोल होता. सूर्यवंशम हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा ‘सूर्यवमसम’चा रिमेक होता. ‘सेट मॅक्स’ या वाहिनीने हा चित्रपट अजरामर केला आहे. यामुळेच सोशल मीडियावर हा चित्रपट नेहमी चर्चेत असतो. बाप-मुलाच्या नात्यात असलेला दुरावा आणि प्रेम यामुळे आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
या चित्रपटाचं शूटिंग गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील ‘बलराम पॅलेस’ मध्ये झालं होत. ही जागा, सर्वात प्राचीन आणि पौराणिक ठिकाणांपैकी एक आहे. आज हा राजवाडा बलराम महल या नावाने ओळखला जातो. यामध्ये आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. हा राजवाडा पाहण्यासाठी लांबून लोक येतात.
बलराम पॅलेस 100 वर्ष जुना आहे. अनेक वर्षापूर्वी पालनपूर नवाब तल्ले मोहम्मद खान यांनी आपल्या राणीसाठी हा महाल बांधला होता. शहराच्या गोंगाटात शांत वातावरणात हे राहण्यासाठी बांधले गेले होते. या पॅलेसला सर्वोत्कृष्ट हेरिटेज हॉटेल म्हणून चार पुरस्कारही मिळाले आहेत.
दरम्यान, ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील सगळीच पात्र, नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. चित्रपटात आजोबांसाठी खीर आणणारा अमिताभ बच्चन यांचा नातू तुम्हाला आठवतो का? हिरा ठाकूरचा हा चिमुकला आता मोठा झाला. या बालकलाकाराने तर आपल्या क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली होती.
सिनेमात छोटे भानु प्रताप भूमिका निभावणाऱ्या कलाकाराचं नाव ‘आनंद वर्धन’ आहे. आनंद आता खूप बदलला आहे. त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंद वर्धन पुन्हा सोशल मिडिया सक्रीय झाला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.
तो अभिनय क्षेत्रात देखील चांगलाच आघाडीवर असून, अनेक सिनेमांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्रियरागालू’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्याला ‘नंदी’ पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सूर्यवंशम’ चित्रपटात काम केले होते.








