Suryakumar Viral Video : “अरे, चांगलं तर चाललंय…”, संघातून बाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल
Suryakumar Viral Video : सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याने चाहत्याला दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

Suryakumar Yadav Fan Viral Video Shreyas Iyer Captaincy : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावून देणारा भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून मँचेस्टर येथे दुसरा टी-२० सामना खेळत आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेत विश्वविजेत्या कर्णधार सूर्याला पदावरून हटवून थेट संघाबाहेर केले आणि नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवले. दरम्यान, संघातून अचानक बाहेर झालेल्या सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याने चाहत्याला दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.
हेअरकट दरम्यान चाहत्याने विचारला प्रश्न; सूर्याचे चोख उत्तर –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव एका सलूनमध्ये हेअरकट (केस कापताना) करताना दिसत आहे. यादरम्यान तिथे उपस्थित असलेला एक चाहता त्याला म्हणाला, “भावा, आम्ही तुला या मालिकेत खूप मिस करतोय…” यावर कोणताही आकस न ठेवता सूर्याने हसत उत्तर दिले, “मला? अरे सगळं तर चांगलं चाललयं…” सूर्यकुमार यादव फलंदाजीत जरी फ्लॉप राहिला असला, तरी कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड सर्वोत्तम होता. मात्र, त्याच्या या खिलाडूवृत्तीच्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.
SKY keeps it classy yet savage. Suryakumar Yadav’s cheeky reply to paparazzi
‘Mujhe kya, sab accha to chal raha hai’ while missing from the T20I squad under Gambhir & new skipper Shreyas Iyer.pic.twitter.com/vN6QdUNeaX— MSDian7 (@ErAKverma_) July 5, 2026
सूर्या बाहेर जाताच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताची घसरगुंडी –
Suryakumar Yadav cooked gautam gambhir and shreyas iyer and whole BCCI for removing him from T20 team! 🤣🔥
When a someone said, “We miss you in Team India,” listen to his reply…. 😂🔥#INDvsENG pic.twitter.com/6f8XEyBNec
— 🌸 (@Invincible39) July 4, 2026
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक आणि टी-२० वर्ल्ड कप २०२६ या दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये जेतेपदाचा मान पटकावला होता. विशेष म्हणजे, सूर्या कर्णधार असताना भारताने एकही मालिका गमावली नव्हती. मात्र, वर्ल्ड कप आणि त्यानंतरच्या आयपीएल २०२६ मधील फलंदाजीतील खराब फॉर्ममुळे बीसीसीआयने त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवला.
दुसरीकडे, नवीन कर्णधार श्रेयस अय्यरला आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या आयर्लंड दौऱ्यावर भारताला २-० असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेटच्या इतिहासात भारताने आयर्लंडविरुद्ध कधीही सामना गमावला नव्हता, पण अय्यरच्या कप्तानीत भारताने थेट मालिकाच गमावली. यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारे श्रेयसच्या नेतृत्त्वा सलग चार सामन्यांत टीम इंडियाचा तिसरा पराभव झाला आहे.





