Suryakumar Yadav Reveals : “सॅमसनला बाहेर ठेवणं सर्वात कठीण निर्णय…!”, सूर्याचा टी-२० विश्वचषक २०२६ बाबत मोठा खुलासा
Suryakumar Yadav Reveals : टीम बसमध्ये संजूने दाखवलेला मोठेपणा आणि घेतलेली सकारात्मक भूमिका भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.

Suryakumar Yadav Reveals Emotional Chat With Sanju Samson T20 World Cup 2026 Final : भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनबाबत (Sanju Samson) एक मोठा आणि भावूक खुलासा केला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांत खराब फॉर्ममुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे हा आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय होता, असे सूर्याने सांगितले. या निर्णयावेळी टीम बसमध्ये संजूने दाखवलेला मोठेपणा आणि घेतलेली सकारात्मक भूमिका भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.
‘तो माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता!’; टीम बसमधील ‘त्या’ संभाषणाचा खुलासा
एका यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सूर्याने सांगितले की, “विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच डावांत संजू केवळ ४६ धावा करू शकला होता. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांत त्याला बाहेर ठेवावे लागले. टीम बसमध्ये मी संजूला विश्वासात घेत परिस्थिती स्पष्ट केली. त्यावर संजूने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, ‘भैया, भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी जे योग्य वाटेल ते करा.’ संजूच्या या उत्तराने मी थक्क झालो; आजच्या काळात असा त्याग करणारा खेळाडू शोधून सापडणार नाही. त्याच्या या शब्दांमुळे माझा आत्मविश्वास कैक पटीने वाढला.”
🚨 Suryakumar Yadav talking about on Sanju Samson 🚨
“That was my toughest call, like all the other calls. So when we went to Sri Lanka in 2024, he didn’t score any runs there. So he said, Surya Bhau, what do you think ? What should I do ? So I said, I will only tell you one… pic.twitter.com/J0cocBntQx
— Vikas (@Vikas662005) August 29, 2026
संजूने सेमीफायनल आणि फायनलमध्ये केली धावांची बरसात –
सुरुवातीला बाहेर बसल्यानंतर संजूने स्पर्धेच्या उत्तरार्धात धमाकेदार पुनरागमन केले. ‘करो या मरो’च्या लढतींमध्ये त्याने नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महाअंतिम फेरीत पुन्हा ८९ धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळून त्याने भारताला घरच्या मैदानावर टी-२० विश्वविजेते बनवले. संजूच्या या खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या.
विश्वचषक जिंकून देणारे दोन्ही हिरो सध्या टीम इंडियातून बाहेर
विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करूनही सध्या हे दोन्ही स्टार खेळाडू भारतीय टी-२० संघातून बाहेर आहेत. विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद आणि संघातील स्थान गेले, तर संजू सॅमसनलाही झिम्बाब्वे दौऱ्यातून थेट डच्चू देण्यात आला. भारतासाठी ६६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ३ शतकांसह १४३२ धावा करणाऱ्या संजू सॅमसनसारख्या मॅच विनरला बाहेर ठेवल्याने निवड समितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





