‘वडिलांसाठी लेक पुढे सरसावली’! सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांना उत्तर ; म्हणाल्या,”एवढं यश मिळल्यानंतरही राज्यात आल्यावर त्यांना…”

Supriya Sule on Amit Shah । शिर्डीमध्ये काल भाजपाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार )अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली” असे म्हणत टीका केली. दरम्यान, अमित शाहांनी वडलीनावर टीका केल्याने लेक पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आता अमित शाह यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
तरीही हेडलाईनसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय Supriya Sule on Amit Shah ।
अमित शाहांच्या या टीकेचा सुप्रिया सुळेंनी चांगलाच समाचार घेतला. अमित शहांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी “एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता.” असे म्हणत शाह यांच्या कारभारवरही बोट ठेवले.
आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात Supriya Sule on Amit Shah ।
पुढे त्यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या बीडच्या सरपंच हत्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. “बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवलं आहे गेल्या काही दिवसांपासून. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण ३१ दिवस लावून धरलं आहे. कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं. आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवालही यावेळी सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं
“१९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली”, असं अमित शाह म्हणाले होते. अमित शाहांनी अशाप्रकारे घणाघाती टीका केल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे.





