walmik karad – बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्यासमोर गुरुवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यापूर्वी १९ फेब्रुवारीला या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी पार पडली होती. या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळाला नाही. मात्र, खटल्याची सुनावणी पुढे सरकत नसेल तर वर्षभरानंतर पुन्हा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची त्याला संधी राहणार आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे जामीन अर्ज आणि दोषमुक्तीचे अर्ज फेटाळले होते. Walmik Karad त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील हा निर्णय त्याच्यासाठी आणखी एक मोठा अडथळा ठरला आहे. या सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केली होती. दीड वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे देखील वाचा : Corruption In Maharashtra : मुंबईत वर्षभरात केवळ 39 लाचखोरीची प्रकरणे; तज्ज्ञ म्हणतात- ‘कमी गुन्हे म्हणजे कमी भ्रष्टाचार नव्हे’ दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबतही नवी माहिती समोर आली आहे. तो आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. ही माहिती त्यांनी सीआयडीला दिल्याचे सांगितले. (Walmik Karad ) कृष्णा आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबाला या आरोपीपासून धोका असल्याची भीती व्यक्त करत त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बातमी वाचा : Arvind Kejriwal : “कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही..”; भाजपचा अरविंद केजरीवालांवर निशाणा