Sonam Wangchuk : सीजेपीने राजकारणात जाऊ नये; सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले मत
देशातील अराजकतेविषयी सीजेपीने सर्व राजकीय पक्षांना जबाबदार धरावे, असे प्रतिपादन लडाखमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, नवोपक्रमशील आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी केले आहे.

Sonam Wangchuk : काॅक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने एक तटस्थ दबावगट म्हणून काम करावे; मात्र त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करु नये. देशातील अराजकतेविषयी सीजेपीने सर्व राजकीय पक्षांना जबाबदार धरावे, असे प्रतिपादन लडाखमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, नवोपक्रमशील आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी केले आहे.
लेह ॲपेक्स बॉडी आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्यात ९ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी लडाखच्या राजकीय आकांक्षा, घटनात्मक संरक्षण आणि हिमालयीन क्षेत्रासमोरील वाढती पर्यावरणीय आव्हाने यांवरही चर्चा केली. वांगचूक म्हणाले की, कोणत्याही एका बाजूची निवड न करता सीजेपीने दबावगट म्हणून काम करणे शक्य आहे.
माझ्या मते, सीजेपीची भूमिका हीच आहे आणि ती अशीच पुढे चालू राहील. जर एखाद्या व्यक्तीने पक्षात सामील होण्याचा किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर त्यात काहीच गैर नाही; कारण शेवटी आपल्याला नेत्यांची गरज असतेच. तरीही, त्यांनी आतापर्यंत जे व्यासपीठ निर्माण केले आहे ते कौतुकास्पदरीत्या तटस्थ आणि राजकीयदृष्ट्या निष्कलंक आहे, आणि ही एक चांगली रणनीती आहे असे मला वाटते.
एखाद्या युवा चळवळीला पाठिंबा देणे आणि सीजेपीला लेह अपेक्स बॉडीशी राजकीयदृष्ट्या जोडले जाणे, यांमधील सीमारेषा तुम्ही कशी ठरवाल, असे विचारले असता वांगचूक म्हणाले की, मी येथे निवडणूक-केंद्रित राजकारणाच्या संदर्भातील पक्षीय राजकारणाबद्दल बोलत नाहीये; पण जर आपल्याला भारतातील राजकारणात उत्तरदायित्व आणायचे असेल, तर तशी शक्यता नक्कीच आहे. तरीही, कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंतर्गत राजकारणात किंवा समीकरणांमध्ये अडकणे मला टाळायचे आहे.
लडाखमध्ये हवी लोकशाही
लडाखच्या अधिक स्वायत्ततेच्या मागणीबद्दल आणि हिमालयासारख्या संवेदनशील परिसंस्थेच्या संरक्षणाच्या तातडीच्या गरजेबद्दल वांगचूक यांनी भाष्य केले.
कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी केंद्रशासित प्रदेशात लोकशाही पुनर्स्थापित केली पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, लडाखमध्ये लोकशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी केली जात आहे.
अशी लोकशाही जी संपूर्ण देशात अस्तित्वात आहे आणि जी येथील अद्वितीय संस्कृती व संवेदनशील पर्यावरणाचे रक्षण करते. संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये दिलेली आश्वचनं आणि वचने असूनही, सरकारला सहाव्या अनुसूचीचा विचार करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळेच, आम्ही (Sonam Wangchuk) आता इतर पर्यायांचाही विचार करत आहोत.






