Shrirang Barne । लोकसभा निवडणुकीचे राज्यातील अंतिम टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाले. आता निकालासाठी 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, त्या अगोदरच महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसून येतंय. शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे. माझा 100 टक्के प्रचार केला नाही Shrirang Barne । मावळ लोकसभेत महायुतीत खदखद होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही, अशी खंत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवलीय. मात्र, तरीही मावळमध्ये माझा 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय. त्याचवेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावं मी अजित पवार यांच्याकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना,”अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला असता तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झालं असतं, “असा दावा श्रीरंग बारणेंनी केला. यापूर्वी संजोग वाघेरे यांनीही 1 लाख 72 हजार 704 मतांनी माझा विजय होईल, असा दावा केला होता. मात्र, श्रीरंग बारणे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या विजयाचं गणित मांडलं. यावर आता महायुती आणि मविआच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. बाराणेंनी आकड्यांचा हिशोबच मांडला Shrirang Barne । दरम्यान, “श्रीरंग बारणे यांनी मावळमध्ये आपला विजय कसा पक्का आहे, हे सांगताना, “मावळच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या मतदारसंघात पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही दोन मोठी महानगरं आहेत. याठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. याठिकाणी उबाठा गटाची ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार मतांपैकी मला दोन लाख मतं पडतील. “असा दावा यावेळी त्यांनी केला. पनवेल विधानसभा मतदारसंघात 1 लाख 80 हजार मतदान पडले. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असेही श्रीरंग बारणे यांनी म्हटले.