पाचगणी – जावळी तालुक्यातील दोन दशकांहून अधिक काळ रखडलेला बोडांरवाडी प्रकल्प मुख्यमंत्री व मी याच्या माध्यमातून पूर्ण करुन असंख्य माथाडी कामगारांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आ. शिवेंद्रराजे शिवेंद्रराजे तुम्ही सांगितल आणि आम्ही कधी ऐकले नाही असं झालयं का, असे विचारत फडणवीस यांनी ‘आ. शिंवेद्रराजे काळजी करु नका, तुमचा बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावणार’ असे सूचक वक्तव्य केले.
माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात फडणवीस यांनी हा शब्द दिल्याने जावळीकरांच्या बोंडारवाडी धरणाच्या आशा आता पुन्हा शिंदे फडणवीस सरकारमुळे पल्लवित झाल्या आहेत.
बोंडारवाडी घरणामुळे जावळीतील ५४ गावांच्या शेतक-यांना शेतीच पाणी मिळणार आहे. याकरीता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वेळी देखील पाहयला मिळत होते.
मात्र, भाजपवासी आ. शिंवेद्रराजे भोसले यांना तितक यश मात्र मिळाल नाही . मात्र, सध्या राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले यांना संधी मिळाल्यावर आज त्यांनी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करताच फडणवीस यांनी त्यांना बोंडारवाडी धरणाबाबत ग्वाही दिली.