Shivsena Operation Tiger : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena Operation Tiger) आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप पूर्णपणे सावरलेला (Shivsena Operation Tiger) नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनतेने महायुतीला भरभरून पाठिंबा दिला, तर महाविकास आघाडीला (काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी) अपेक्षित यश मिळाले नाही. अशा पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठे सूचक विधान केले आहे. त्यांनी “ऑपरेशन टायगर” आणि “ऑपरेशन तुतारी” गाजावाजा करत नसून अपसुकच (स्वतःहून) होईल, असे म्हटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Eknath Shinde उदय सामंत यांचे विधान कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “पन्नास जणांनी निर्णय घेतल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि त्यानंतर शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरमधून (Shivsena Operation Tiger) अनेक बडे नेते शिवसेनेशी जोडले गेले आहेत. आता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी गाजावाजा करत नाही, तर अपसुकच होईल.” सामंत यांनी संजय राऊत यांच्या दाव्याचा उल्लेख करत म्हटले की, सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून २५-२५ आमदार बाहेर पडतील, असा दावा राऊत यांनी केला होता. हाच धागा पकडत सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शरद पवार गटात फूट पडण्याचे संकेत दिले आहेत. गणेश नाईक यांना इशारा यावेळी उदय सामंत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यावर सतत टीका करणाऱ्या नाईक यांना उद्देशून ते म्हणाले, “नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा आमच्याकडेही पदाधिकारी आहेत आणि ते त्यांचा समाचार घेतील.” कोल्हापूर लोकसभेबाबत मोठे भाष्य उदय सामंत यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. अद्याप लोकसभा निवडणुकीला तीन वर्षे बाकी असतानाच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. ते म्हणाले, “कोल्हापुरातील ‘आपलं ठरलंय आणि आमचं ठरलंय’ याची व्याख्या अद्याप कळाली नाही. एकीकडे आपलं ठरलं म्हणायचे आणि पक्षाला गाडायचे, हे चालणार नाही. कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला करायचा आहे.” सामंत यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पराभवाबाबत चर्चा टाळली. ते म्हणाले, “मंडलिक यांचा पराभव का झाला याची चर्चा आता करायची नाही. पुढील निवडणुकीत पक्षाची बांधणी चांगली झाली तर मंडलिक यांना दीड लाख मतांनी विजय मिळेल, असा विश्वास आहे.” ते पुढे म्हणाले, “आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महायुती म्हणूनच लढवायच्या आहेत. संजय मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असतील.” उदय सामंत यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.