प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी शिरुर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, जमिनीचे व पिकांचे तातडीने पंचनामे करावे, पीक विम्याचे पैसे ताबोडतोब द्यावे, नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आदी मागण्या केल्या आहेत. शिरुर तालुका शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख पोपट शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना समन्वयक रविंद्र मिर्लेकर व आमदार सचिन अहिर, शिरुर हवेली संर्पक प्रमुख मनोज इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर तालुका शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पोपट शेलार, जिल्हा संघटक राजेंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख कैलास भोसले, महिला तालुका संघटक चेतना ढमढरे, अमोल हरगुडे, राहुल शिंदे, अनिल सातकर, आनंदा चौधरी, अनिल पवार, खुशाल गावडे, सचिन राऊत, आकाश पोटे आदी उपस्थित होते,