Satara News – सातारा शहराचा शाश्वत विकास होताना पर्यावरणाची हानी आणि वृक्षतोड हे दोन घटक येथील भौगोलिक परिस्थितीला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे सातारा पालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी स्वतंत्र पथक नेमून वृक्ष विभागाला व्यापक चौकट देण्याचा प्रयत्न करायला हवा. निधीची तरतूद पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शन आणि हरित योजनांची कामे याकरिता कालबद्ध कार्यक्रम सातारा पालिकेने असल्यास सातारा शहराचे पर्यावरण समृद्ध होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची सातारकरांना पर्यावरण समृद्ध भवताल हवा आहे. सातारा हे नैसर्गिक सौंदर्य आणि डोंगररांगांनी वेढलेले शहर असले तरी वाढती वाहतूक, बांधकामांची धूळ, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि अनियोजित शहरीकरण यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. “लहान शहरात प्रदूषण नसते” हा समज आता वास्तवाशी विसंगत ठरत आहे. त्यामुळे सातारा पालिकेने तातडीने ठोस,पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणे गरजेचे ठरले आहे. सातारा नगरपालिका पालिकेसाठी पर्यावरणपूरक उपाययोजना 1. ग्रीन मोबिलिटीचा प्रसार – पालिकेने ई-बस, ई-रिक्शा यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे. सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्ग विकसित केल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. 2. धूळ नियंत्रण मोहीम – रस्त्यांची नियमित साफसफाई, पाणी फवारणी, बांधकाम साईटवर ग्रीन नेट अनिवार्य करणे यामुळे PM10 आणि PM2.5 कणांमध्ये घट होऊ शकते. 3. कचरा व्यवस्थापनात सुधारणा – ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, कचरा जाळण्यावर कठोर बंदी घरगुती कंपोस्टिंगला प्रोत्साहन देणे. 4. हरित पट्टे आणि वृक्षारोपण – शहरातील मोकळ्या जागांवर, रस्त्यांच्या कडेला आणि नदीकिनारी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मिनी फॉरेस्ट” (Miyawaki पद्धत) विकसित करणे. 5. एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम – शहरात विविध ठिकाणी AQI मॉनिटर बसवून नागरिकांना रिअल-टाइम माहिती देणे आणि त्यावर आधारित धोरणे ठरवणे. 6. औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण – MIDC आणि लघुउद्योगांवर उत्सर्जन मानकांची कडक अंमलबजावणी नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 7. जागृती आणि लोकसहभाग – शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत .“No Vehicle Day”, “Clean Air Campaign” सारखे उपक्रम. 8. स्मार्ट सिटी तत्त्वांचा वापर – ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, सिग्नल सिंक्रोनायझेशन .वाहनांची गर्दी आणि थांबण्याचा वेळ कमी करून प्रदूषण घटवणे. अंमलबजावणीतील अडचणी योजनेपेक्षा अंमलबजावणी हा मोठा प्रश्न आहे. निधीची कमतरता, प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि नागरिकांचा मर्यादित सहभाग हे अडथळे ठरतात. त्यामुळे पालिकेने केवळ घोषणा न करता टाइमबाउंड अॅक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.सातारा पालिकेमध्ये पर्यावरण तज्ञांची एक समिती नेमून त्यांना पालिकेच्या कारभारामध्ये संलग्नित करून घेण्यात यावे किंवा वृक्षा समितीमध्ये त्यांचा अंतर्भाव करून पर्यावरणाचे व्यापक स्वरूपातील काम सुरू करायला हवे . कार्बन झिरो सिटी हा या उपक्रमातला एक महत्त्वपूर्ण टप्पा असला तरी त्यामध्ये सातत्य राखले जाणे गरजेचे आहे .