Sanju Samson Records : संजू सॅमसनचा दिल्लीत मोठा पराक्रम! कोहली-रोहितच्या खास क्लबमध्ये मारली थेट एन्ट्री
Sanju Samson Records : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. या दरम्यान संजू सॅमसनने एका विक्रमाला गवसनी घातली आहे.

Sanju Samson Completes 9000 T20 Runs Abhishek Sharma Smashes Historic 30 Ball Century : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याची सुरुवात चौकार-षटकारांच्या महातांडवाने झाली. या सामन्यात एका बाजूने सलामीवीर संजू सॅमसनने (Sanju Samson) टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठत वैयक्तिक पराक्रम केला, तर दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माने तुफानी शतक ठोकत सामन्याचे चित्र एकतर्फी पालटून टाकले. या दोघांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा अक्षरशः पालापाचोळा केला.
नबीच्या गोलंदाजीवर षटकार; ९००० धावा पूर्ण करणारा ५ वा भारतीय –
डावाच्या चौथ्या षटकात मोहम्मद नबीच्या चेंडूवर धाव घेत संजूने ९ हजार धावांचा पल्ला गाठला. सामन्यापूर्वी त्याला या विक्रमासाठी २३ धावांची आवश्यकता होती. हा टप्पा ओलांडताच संजूने नबीला सलग दोन उत्तुंग षटकार खेचले. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकत ५० धावांची खेळी केली. यासह विराट कोहली (१४,२१८), रोहित शर्मा (१२,५३१), शिखर धवन (९,७९७) आणि सूर्यकुमार यादव (९,७२९) यांच्यानंतर टी-२० मध्ये ९ हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे.
अभिषेकचे अवघ्या ३० चेंडूंत शतक; रोहितचा ९ वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त!
𝐒𝐀𝐍𝐉𝐔-𝐒𝐀𝐓𝐈𝐎𝐍𝐀𝐋 9K💥
A monumental achievement for Sanju Samson as he becomes the 5th Indian player to reach 9,000 runs in T20 cricket history 👏🏻
[Sanju Samson, T20 Cricket, Team India, Milestone] pic.twitter.com/b7T7132cgl
— 100MB (@100MasterBlastr) September 17, 2026
दुसऱ्या टोकाला अभिषेक शर्माने मैदानात अक्षरशः आग ओकली. त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर ३० चेंडूंत ऐतिहासिक शतक झळकावून रोहित शर्माचा ९ वर्षे जुना महाविक्रम (३५ चेंडू) मोडीत काढला. अभिषेक आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्याने ३४ चेंडूंत ९ चौकार आणि तब्बल ११ षटकारांसह १०८ धावांची वादळी खेळी साकारली.
सलामी जोडीचे अभूतपूर्व तांडव; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची तुफान धुलाई!
संजू आणि अभिषेक या सलामी जोडीने सुरुवातीच्या षटकांतच अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले. संजूच्या संयमी तरी आक्रमक अर्धशतकाने आणि अभिषेकच्या शतकी वादळाने भारताला भक्कम धावसंख्येकडे नेले. या विक्रमी भागीदारीने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीचा नवा दरारा निर्माण केला आहे. या दोघांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत ७ गडी गमावून २२१ धावांचाच डोंगर उभार करु शकला.





