संजय राऊतांचं पुन्हा मोठं विधान: “शेवटच्या क्षणापर्यंत आशावादी राहू” ठाकरे बंधू एकत्र येणार? CM फडणवीसांवर घणाघात थेट म्हणाले…

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांंना उधाण आले होते, असे असताना मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये भेट झाली. यामुळे एकत्र ठाकरे बंधून एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचे संकेत मिळत असतानाच आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा याबाबत एक मोठं विधान केले आहे.
मुंबई परप्रांतीय उद्योगपती गिळकृंत करीत आहेत. शिंदे, भाजपसारखे त्यांना मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्राभिमान्यांनी एकत्र यावे, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता संजय राऊतांच्या या विधानामुळे युतीबाबात नेमके काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
तसेच मराठी माणसाच्या एकत्रीकरणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आशावादी राहू, असे म्हणत एकत्र येण्यााबातची दार खुली केली आहेत. शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपला लक्ष करत भाजप, त्यांचे नेते मराठी माणूस व महाराष्ट्राचे शत्रू असल्याची टीकाही यावेळी बोलताना केली.
देवेंद्र फडणवीस मुख्य हस्तक
या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र डागले. देवेंद्र फडणवीस हे गौतम अदानी किंवा मुंबईतील उद्योपती, बिल्डर यांचे समर्थक आणि मुख्य हस्तक आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मराठी माणसाला न्याय देण्याची व मराठी माणूस मुंबईत टिकावा, ही भूमिका राज आणि उद्धव यांची आहे, असेही ते म्हणाले. भाजप, त्यांचे नेते मराठी माणूस व महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यामुळेच फडणवीस, भाजप, शिंदे, शहांसारख्या नेत्यांनी मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणूस संपविण्याचा विडा उचल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा: राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; कोकणात रेड अलर्ट जारी…





