‘भाजप UCC आणण्याचा प्रयत्न करतंय अन् RSS …’ ; मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut on Mohan Bhagwat । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ.मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संघप्रमुखांवर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी भाजपलाही कोंडीत पकडले आहे.
संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्याविषयी बोलताना, “मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येची खूप काळजी आहे आणि त्यांना लोकसंख्या किती वाढवायची आहे? हा सल्ला भाजपच्या लोकांना द्यावे. एके ठिकाणी तुमचे सरकार यूसीसी आणू इच्छिते आणि भाजपची पॅरेन्ट बॉडी असणारी आरएसएसचे, ती म्हणते मुले वाढवा.” अशी टीका त्यांनी केली.
‘मोहन भागवत म्हातारे झाले’ Sanjay Raut on Mohan Bhagwat ।
ते पुढे म्हणाले, “आपला देश धोक्यात आहे. सरकार नोकऱ्या देत आहे का? सरकार शेतक-यांना भाव देत आहे का? सरकार शिक्षण देतेय, ते फुकट आहे का? मोहन भागवत वृद्ध आहेत हे ठीक आहे, पण पंतप्रधान मोदी जी मला सांगा जर हिंदूंना धोका असेल तर त्यांच्या धोरणांमुळे जगभरात हिंदूंनाही धोका आहे.असे त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मोहन भागवत? Sanjay Raut on Mohan Bhagwat ।
लोकसंख्येतील घट ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी (1 डिसेंबर) सांगितले. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. अशा प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले. लोकसंख्या २.१ च्या खाली जाऊ नये.
ते पुढे म्हणाले, “आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण 1998 किंवा 2002 मध्ये ठरविण्यात आले होते. कोणत्याही समाजाची लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये, असेही त्यात म्हटले आहे. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा. ही संख्या समाजाला मदत करेल. जगणे महत्वाचे आहे.”असेही त्यांनी म्हटले होते.





