‘आम्ही सगळं घडताना पाहिलंय’ ; ईव्हीएम गोंधळाच्या दाव्यावर राऊतांचे मोठे विधान, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वरही दिली प्रतिक्रिया

Sanjay Raut on EVM । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार करून महायुतीने एवढा मोठा विजय मिळवल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे यूबीटी खासदार आणि दिग्गज नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
ईव्हीएमवर बोलताना संजय राऊत यांनी ,”आम्ही सर्व काही घडताना पाहिले आहे.” असा आरोप यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा स्पष्ट आरोप केला. याआधीही संजय राऊत यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘सत्ताधारी सभागृह चालू देत नाही Sanjay Raut on EVM ।
पुढे बोलताना त्यांनी सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनविषयी वक्तव्य केले. त्यांनी यावेळी,”सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदाणी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, “असेही अविश्वास ठरवाबाबत संजय राऊत म्हणालेत.
ते तर ऑपरेशन डर होतं… Sanjay Raut on EVM ।
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजप अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही. ते तर ऑपरेशन डर होतं. पळून घाबरून गेले ते. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असं संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेनेचा पलटवार
संजय राऊत यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांच्याकडून असे आरोप करणे म्हणजे ही अतिशय बालिश कृती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते अविश्वास व्यक्त करत राहतात. ते प्रत्येक गोष्टीवर अविश्वास व्यक्त करतात. त्यांचा कोणत्याही सरकारी संस्थेवर विश्वास नाही आणि जेव्हा ते लोकसभेत जिंकतात तेव्हा ते म्हणतात की, ईव्हीएम ठीक आहे. पण हरल्यावर ते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करू लागतात.” असे म्हणत कायंदे यांनी राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.





