Sanjay Raut : “महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर नेत्याच्या जवळीची महिला नको तर…”; संजय राऊत स्पष्टच म्हणाले…

Sanjay Raut – महिला आयोग राज्याचा किंवा राष्ट्रीय असेल, तर त्या जागेवर बिगर राजकारणी व्यक्ती पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच अध्यक्ष आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही हे घटनात्मक पद आहे. यामुळे राज्यातल्या देशातल्या महिलांवरील अत्याचाराला वाटा फुटते. आम्ही त्याला काय करतो, की नेत्याच्या जवळच्या महिलेला त्या पदावर बसवतो आणि कॅबिनेट दर्जा देतो हे चुकीचे असल्याचे मत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. हगवणे परिवार आता तुरूंगात असून त्यांना कडक शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे. हे प्रकरण चर्चेत येताच वैष्णवीची भावजय मुयरीनेही आपला छळ झाल्याचे म्हटले होते. राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्चे सांगितले. त्यामुळे विरोधकांनी राज्य महिला आयोगावर टीका केली होती. अशातय यावर बोलताना ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्य महिला आयोग पदावर अराजकीय व्यक्ती हवी असल्याची मागणी केली आहे.
जुलमी राज्य व्यवस्थेचे हे सूत्रधार
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचे राज्य निर्माण केल्याने यांना घाबरून काही लोक पळून जातात. काही लोकं हा दबाव स्वीकारत नाहीत, त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले. हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचावे, त्यांनी यासाठी वाचावे की यंत्रणांचा गैरवापर केला. जुलमी राज्य व्यवस्थेचे हे सूत्रधार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी पुस्तक वाचायलाच पाहिजे आणि शांतपणे पुस्तकाचा गाभा समजून घ्यायला पाहिजे. बराचा काळ ते आमचे सहकारी होते, जेव्हा त्यांचा भाजपात पळून जाण्याचा मार्ग निर्माण झाला त्याआधी ते माझ्यासोबत होतेच, माझ्या बाबतीत काय घडले याची त्यांनी कल्पना होती. त्यामुळे पत्रात लिहिले आहे की तुम्ही या घटनांचे साक्षीदार आहात म्हणून पुस्तक वाचले पाहिजे, असे राऊत म्हणाले.





