ठाकरेच लोकसभेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरतील; मविआच्या 35 जागा निवडून येतील, ‘या’ नेत्याचं वक्तव्य चर्चेत…

Sanjay Jadhav on Uddhav Thackeray – मुळात राज्यात मराठा ओबीसी वाद हा भाजप अन त्यांच्या नेतृत्वानेच लावला, असे आरोप ठाकरे गटाचे नेते आणि परभणी लोकसभेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी केला. तसेच बीडमध्ये घडलेली घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते एका वृत्तवाहिणीशी बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभेत उद्धव ठाकरेच मॅन ऑफ द सिरीज ठरतील, असा दावा देखील केला. जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.
आजपर्यंत ओबीसींसाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला. सगळ्या समाजांनी रस्त्यावर उतरुन, सरकारवर दबाव आणून काही मागण्या मान्य करुन घेतल्या.
त्यामध्ये मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? प्रत्येकाला स्वत:च्या समाजासाठी गोष्टी मागण्याचा नैतिक अधिकार आहे.
या गोष्टी मिळवण्यासाठी मराठा रस्त्यावर उतरला तर तो दोषी आहे का?, मराठ्यांनी ओबीसीतून किंवा सगेसोयऱ्याचे आरक्षण मागणे चुकीचे आहे का?, असा सवाल जाधव यांनी भाजपसह महायुतीला विचारला.
मविआच्या 35 जागा येतील
बंडू जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच ‘मॅन ऑफ द सिरीज’ राहतील. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 35 जागा निवडून येतील, असा दावा बंडू जाधव यांनी केला.





