प्रभात वृत्तसेवा संगमनेर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १ कोटी ५० लाख ५ हजार ४७७ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरात पर्यावरण संवर्धन, पर्जन्यजल संचयन, सौर ऊर्जा वापर आणि जनजागृतीसाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. या निधीअंतर्गत वृक्षारोपण व गार्डन विकास (समूहित) ७४ लाख ४५ हजार ८०३(विविध उद्याने , खुल्या जागा , रस्ता कडेची लागवड आणि घनदाट वनराई प्रकल्प यांचा समावेश), पर्जन्यजल संचयनासाठी परकुलेशन पिट्स २२ लाख ५१ हजार ६४१, कवी अनंत फदी नाट्यगृह येथे ऑन-ग्रिड सौरऊर्जाप्रणाली ४२ लाख ४ हजार ३३, पर्यावरण विषयक माहिती शिक्षण जनजागृती मोहिम ७ लाख५० हजार आता एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे महायुती सरकारकडून संगमनेरच्या पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेला १ कोटी ५० कोटींचा निधी हा संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा आहे. वृक्षारोपण, पर्जन्य जल संचयन आणि सौर ऊर्जा यांसारख्या उपक्रमांमुळे शहरात हरित व शाश्वत विकासाला चालना मिळेल. नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व कामे गतिमान पद्धतीने पूर्ण केली जातील, अमोल खताळ पाटील,आमदार