“जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत…” ; वाल्मिक कराडचे नाव घेत संदीप क्षीरसागर यांनी केली ‘ही’ मागणी

Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde । बीडमधील सरपंच संतोष गायकवाड यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाने राज्यात वातावरण चांगलेच चिघळत चालल्याचे दिसत आहे. या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावरुन आणि वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी,”वाल्मीक कराडला धनंजय मुंडेनी पोलिसांकडे सुपूर्द करावंं,” अशी मागणी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप क्षीरसागर यांनी,”मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसला त्याचवेळी मी 28 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde ।
पुढे त्यांनी, “आम्ही या घटनेचे कधीच राजकारण केले नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
सभागृहात आम्ही या प्रकरणाचे राजकारण केले नाही Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde ।
संदीप क्षीरसागर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना, “घटना घडल्यानंतर मी गावात गेलो, त्यावेळी गावकऱ्यांनी आणि पीडित कुटुंबांनी मला याबाबत माहिती देताना या प्रकरणातील सूत्रधाराचे नाव घेतले, त्याचबरोबर त्यांनी त्यांची दहशत कशी आहे त्याची माहिती दिली ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्यामध्ये रोष देखील होता आणि ते घाबरलेले देखील होते. मी जेव्हा त्यांना सांगितलं, मी तुमच्यासोबत आहे. आपण या प्रकरणातील वाल्मीक कराड यांना कारवाई करू. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला त्यांचा एवढा त्रास झालाय की आम्ही पोलीस स्टेशन देखील जाळून टाकला आम्हाला एवढा त्रास झाला आहे. अधिवेशनात देखील हा विषय मांडू असे त्यांना सांगितले होते. हा विषय जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने मांडला, सभागृहात आम्ही या प्रकरणाचे कसलेही राजकारण केले नाही सत्ताधारी पक्षातील आमदारांशी याबाबत बोलणं झालं, त्यांनी देखील याबाबत प्रश्न मांडले. राजकारणामध्ये वैर होतात आपण समजू शकतो. मात्र ही घटना घडली आणि ज्या प्रकारे घडली ते भयानक होतं. लोकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं होतं की त्यांना क्रूरपणे मारताना या घटनेतील सूत्रधार वाल्मीक कराड ही घटना व्हिडिओ कॉल वर पाहत होता अशा घटना चित्रपटांमध्ये देखील होत नाहीत,” असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.





