‘तुमच्याकडे शक्ती असेल तरच जग प्रेमाची भाषा ऐकते’, भारत-पाक तणावावर RSS प्रमुखांचा जागतिक संदेश

जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जग प्रेमाची भाषा तेव्हाच समजते जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते.” भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणावपूर्ण वातावरण असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. जयपूर येथील रविनाथ आश्रमात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी भारतीय संस्कृती, त्यागाची परंपरा आणि देशाच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला.
भारतीय संस्कृतीचा गौरव –
भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, “भगवान श्रीरामांपासून भामाशाहपर्यंत भारताच्या इतिहासात त्याग आणि सेवेचे अनेक आदर्श आहेत. हा आपली सांस्कृतिक वारसा आहे.” भारताचा इतिहास केवळ युद्धांचा नसून धर्म, सेवा आणि लोककल्याणाच्या भावनेने परिपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
दुस्साहसाला चोख प्रत्युत्तर –
भारत जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगताना भागवत म्हणाले, “भारत कुणाशी वैर बाळगत नाही, पण जर कुणी दुस्साहस केले तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतात आहे.” भारताच्या या सामर्थ्याची जगाने अनेकदा प्रचिती घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भागवत यांचे हे वक्तव्य अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईशी जोडले जात आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan | RSS chief Mohan Bhagwat says, “…India will progress in every field; it should. India doesn’t have enmity with anyone, but if someone dares, India has the strength to teach them a lesson; it should have this strength. India does things which are… pic.twitter.com/esLvQrpi1u
— ANI (@ANI) May 17, 2025
भारत ‘मोठा भाऊ’
भागवत यांनी वारंवार शक्तीच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “शक्ती हेच ते माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपली भूमिका जगासमोर ठामपणे मांडू शकतो. शक्ती नसेल तर प्रेमाची भाषा कुणी ऐकत नाही.” भारत अनेक देशांसाठी मोठ्या भावासारखा आहे, पण याचा अहंकार बाळगू नये, असेही ते म्हणाले.
संत समाजाचे कौतुक –
संत समाजाची प्रशंसा करताना भागवत म्हणाले, “ऋषी परंपरेचे पालन करत संत आजही भारतीय संस्कृती आणि धर्माचे रक्षण करत आहेत. संतांच्या सहवासातून मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते.” सर्वांनी संतांशी जोडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला राजस्थानच्या उपमुख्यमंत्र्यी दीया कुमारी, अनेक प्रचारक, स्वयंसेवक आणि साधू-संत उपस्थित होते.
जागतिक भूमिकेला अधोरेखन –
भागवत यांच्या या वक्तव्याला भारताच्या जागतिक भूमिका आणि भू-राजकीय दृष्टिकोनाशी जोडले जात आहे. “शक्तीशाली भारत केवळ स्वतःचे संरक्षणच करू शकत नाही, तर जगाला योग्य दिशा दाखवू शकतो,” असा संदेश त्यांनी दिला. या वक्तव्यातून भागवत यांनी भारताच्या सामर्थ्याचा आणि शांतताप्रिय स्वभावाचा जागतिक पातळीवर पुनरुच्चार केला आहे.





