‘रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा’; संभाजीराजेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Sambhajiraje Chhatrapati | रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.
संभाजीराजेंनी पत्रात काय म्हटलं आहे?
“हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि केंद्रीय संरक्षित स्मारक असलेल्या दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा आणि शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे”, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. Sambhajiraje Chhatrapati |
शिवस्नुषा श्री छत्रपती ताराबाई महाराणी साहेबांच्या समाधी स्थळाबाबत मुख्यमंत्री महोदयांस पत्र दिले…@CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/NhohbDU4jI
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 22, 2025
“समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे”, अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
“कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमयदित ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे”, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. Sambhajiraje Chhatrapati |
हेही वाचा:





