RCB Name Change : आरसीबीचे नाव बदलणार? मालकी बदलताच चेअरमन आर्यमन बिर्लांनी घेतला मोठा निर्णय, पाहा VIDEO
RCB Name Change : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावात बदल करण्याबात मोठी अपडेट समोर आली आहे.

RCB Name Change Rumours Clarified Chairman Aryaman Birla Confirms No Change In Identity : आयपीएलमध्ये सलग दोन हंगामांत जेतेपदाचा चषक उंचावून इतिहास रचणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फ्रँचायझीची मालकी पूर्णपणे बदलल्यानंतर संघाचे मूळ नाव बदलले जाणार असल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले होते. मात्र, आरसीबीचे नवे चेअरमन आर्यमन बिर्ला यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. नव्या व्यवस्थापनाने चाहत्यांच्या भावनांचा आणि आरसीबीच्या जागतिक ब्रँड मूल्याचा सन्मान करत संघाचे नाव न बदलण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
संघाची १००% मालकी बदलली; पण ‘आरसीबी’ ब्रँड कायम राहणार!
आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, ब्लॅकस्टोन आणि बोल्ट व्हेंचर्स यांच्या संयुक्त कन्सोर्टियमने आरसीबीची १०० टक्के मालकी खरेदी केली होती. या ऐतिहासिक कॉर्पोरेट टेकओव्हरनंतर नवीन मालक स्वतःच्या ब्रँडिंगनुसार नाव बदलतील, असा कयास लावला जात होता. मात्र, एका कार्यक्रमात आर्यमन बिर्ला यांनी स्पष्ट केले की, “आरसीबी हा एक जागतिक आणि प्रचंड ताकदीचा ब्रँड आहे. आम्हाला हे नाव मनापासून आवडते आणि यात कोणताही बदल केला जाणार नाही.” यापूर्वी त्यांची बहीण अनन्या बिर्ला हिनेही संघाची ओळख कायम राहील असे संकेत दिले होते.
१८ वर्षांचा दुष्काळ संपला; पाटीदारच्या नेतृत्वात सलग दोनदा चॅम्पियन –
🚨 Breaking 🚨
“That’s not happening. We think it’s a fantastic team, we think it’s a fantastic franchise. Royal Challengers Bangaluru has built a fantastic brand, a brand that consumers and fans love.”
Aryaman Birla, director, Aditya Birla Group and the chairman of the Royal… pic.twitter.com/IyKvFn1LJ9
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 5, 2026
२००८ पासून २०२४ पर्यंत विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू संघात असूनही आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मात्र, २०२५ मध्ये भारतीय फलंदाज रजत पाटीदारकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आणि त्याने पहिल्याच झटक्यात १८ वर्षांचा दुष्काळ संपवून संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने आपला विजयी अश्वमेध कायम राखत आयपीएल २०२६ चे विजेतेपदही पटकावले आणि सलग दोनदा ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला.
२०२७ मध्ये जेतेपदाच्या हॅटट्रिकवर नजर; चाहत्यांचा जल्लोष –
सलग दोनदा चॅम्पियन बनल्यानंतर आता आरसीबीची नजर २०२७ मध्ये जेतेपदाची अभूतपूर्व हॅटट्रिक साध्य करण्यावर लागली आहे. मैदानावर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या संघाचे नाव आणि मूळ ओळख कायम राहिल्याने जगभरातील चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. नवीन व्यवस्थापनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संघ आणि चाहत्यांमधील अतूट नाते आणखी घट्ट झाले आहे.





