मुंबई : बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या विविध नियामक निकषांचे आणि तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने राज्यातील 3 सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. सातारा सहकारी बँक लिमिटेड, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये जारी केलेल्या अधिकृत आदेशांनुसार, सातारा सहकारही बँ लिमिटेडला बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम २० आणि कलम ५६ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि तुमचा ग्राहक जाणून घ्या (केवायसी) नियमांचे पालन न केल्याबद्दल ८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला देखील त्याच तरतुदींनुसार अशाच प्रकारच्या उल्लंघनांसाठी आणि केवायसीशी संबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल १.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरबीआयने स्पष्ट केले की हे दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहेत आणि बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही.