Ramdas Athawale on Lok Sabha। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीतील अनेक घटकपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा चालू झाली आहे. त्यातच एनडीएतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षानेही आता एका जागेची मागणी केलीय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
एनडीएचे ४०० पेक्षा जास्त सदस्य निवडून येतील Ramdas Athawale on Lok Sabha।
रामदास आठवले एका जागेची मागणी करताना, ‘सरकारला सूचना करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र मोदी हटावची मोहिम इंडिया आघाडीने आखली आहे. परंतु, मोदींना हटवणं येरागबाळ्याचं काम नाही. १९९२ मध्ये भाजपाचे दोनच खासदार होते, परंतु आता २०२४ मध्ये ३७० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त सदस्य निवडून येतील,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
…तरीही मी लोकसभेचा माणूस Ramdas Athawale on Lok Sabha।
पुढे “लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे, की मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही मी लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणं आवश्यक आहे”, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय.
तसेच “देशभरातील लोक मला विचारत आहेत. आरपीआयला शिर्डीतून एक जागा द्यावी. येथून आरपीआयचा उमेदवार जिंकून यावा अशी देशभरातील लोकांची मागणी आहे. शिर्डीतील लोकांचीही ही भावना आहे. मी तिथून निवडून आलो तर मोदींच्या मंत्रिमंडळात मला नक्कीच संधी मिळेल. त्या मंत्रिपदाचा मी उपयोग करेन.”
शिर्डी लोकसभेचा कायापालट करेन, न्याय देण्याचं काम मी मंत्रिपदाच्या माध्यमातून करू शकेन. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विनंती आहे की, लोकांच्या भावनांचा आदर राखणं गरजेचं आहे. आम्हाला एकतरी जागा मिळावी. आम्हाला एकही जागा मिळाली नाहीतर आम्हाला तोंड दाखवणं अवघड होऊन जाईल. दलित मतं ट्रान्सफर करायची असतील तर आरपीआयला जागा द्यावी”, असेही आठवलेंनी यावेळी म्हटले.