Raigad Rain Update: महाड तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; सावित्री, काळ, गांधारी, नागेश्वरी नद्या ओव्हरफ्लो
Updated On:

Raigad Rain Update: महाड तालुक्यात बुधवारपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे येथील सावित्री, काळ, गांधारी, नागेश्वरी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, गांधारी, नागेश्वरी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नद्यांचे पाणी शेजारील भात शेतांमध्ये तसेच महाड शहरातील काही भागांमध्ये शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवस मुसळधार पावसामुळे वरंधा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर महाड तालुक्यातील चोचिंदे, मुठवली, सव, गोठे, रावढळ, तुडील, जुई, कुंबळे, बेबलघर, चिंबावे, तेलंगे, रोहन, वलंग, ओवळे या गावाच्या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय किल्ले रायगड परिसरातील 25 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे.





