Rahul gandhi on EVM । लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (ईव्हीएम) मुद्दा जोरदारपणे उचलून धरला होता. पण निवडणूक निकाल जाहीर होताच हा मुद्दा चर्चेतून गायब झाला. मात्र, यावर नेत्यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आता ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत येताना दिसत आहे. यावेळी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलाय. ईव्हीएम हा एक “ब्लॅक बॉक्स” Rahul gandhi on EVM । राहुल गांधी यांनी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांची एक्स-पोस्ट पोस्ट शेअर करताना एका वृत्तपत्राचा हवाला देत सरकारवर टीका केली. याविषयी बोलताना राहुल गांधी यांनी, ‘भारतातील ईव्हीएम हा एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही ते तपासण्याची परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.” असे त्यांनी म्हटले. मुंबईतील घटनेचा उल्लेख केला Rahul gandhi on EVM । राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई घटनेचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंदी असतानाही मंगेश पांडिलकर यांनी मुंबईतील गोरेगाव निवडणूक केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय, पोलिसांनी पंडिलकर यांना मोबाईल फोन दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या एका कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या अनेक उमेदवारांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मतदारसंघातून अवघ्या 48 मतांनी विजयी झाले, त्यामुळे बराच वाद झाला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील हा सर्वात कमी फरकाने विजय आहे.