नवी दिल्ली : संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी संसदेतील भाषणही काढून टाकल्याची चर्चा आहे.
‘मोदी आडनाव प्रकरणी’ दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत,”मला धमकावून, तुरुंगात टाकून, मारहाण करून, अपात्र ठरवून मला गप्प करू शकतील, असे पंतप्रधानांना वाटत असेल, तर ते गैरसमजात आहेत, असे राहुल गांधी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान घाबरले आहेत. त्यांनी विरोधकांना सर्वात मोठे शस्त्र दिले आहे. मला या सगळ्याची पर्वा नाही. असे म्हणत भाजपच्या माफीच्या मागणीवर राहुल गांधी म्हणाले, “माझे नाव सावरकर नाही. मी गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाहीत.” असे म्हणत पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्याला हात घातला आहे.
The Prime Minister is scared of my next speech on Adani, and I have seen it in his eyes. That is why, first the distraction and then the disqualification: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/irLFG9Flb9
— ANI (@ANI) March 25, 2023
पुढे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, “लोकशाहीवर हल्ला होत आहे. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले. मी नियम समजावून सांगितले आणि स्पीकरला सविस्तर पत्रही लिहिले, पण मला बोलू दिले नाही. भाजपवाले मला भारतविरोधी म्हणतात. एक सदस्य म्हणून मला स्पष्टीकरण देण्याचा अधिकार आहे, पण वक्त्यांनी मला बोलू दिले नाही.असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
तसेच शेवटी ‘मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे आभार. भविष्यात एकत्र काम करू. असे सांगत आता ही कायदेशीर बाब आहे. यावर बोलणे योग्य नाही. मी भारतासाठी लढणार आहे. मी लोकशाहीसाठी लढणार आहे.असे त्यांनी म्हटले.