काँग्रेसच्या खासदारांच्या चेहऱ्यावर अदानी अन् मोदींचे मुखवटे ; राहुल गांधींनी भाजपला डिवचले ; काँग्रेसच्या कृतीवर भाजप आक्रमक

Rahul Gandhi । गौतम अदानी लाचखोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. संसदेत या विषयावर चर्चा होऊ न दिल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने विरोध करण्यासाठी एक नवीन मार्ग अवलंबला. काँग्रेसने केलेल्या कृतीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संबंधांचा पुनरुच्चार केला. त्यासाठी त्यांनी एक छोटा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ संसदेच्या परिसरात बनवण्यात आला असून त्यात काँग्रेसचे खासदार शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान मोदींचा मुखवटा घातला होता. तर काँग्रेसचे मणिकम टागोर यांनी उदोगपती गौतम अदानी यांचा मुखवटा घातला होता. समोर उभे असलेले राहुल गांधी या दोघांना काही सवाल करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काँग्रेसच्या या व्हिडिओवर सध्या भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.
यह एक ख़ास और पुराना रिश्ता है! #ModiAdaniEkHai pic.twitter.com/s6iF1YeCcX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 9, 2024
राहुल गांधींनी कोणते प्रश्न विचारले ? Rahul Gandhi ।
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे मुखवटे घालून उभे असलेल्या खासदारांना काही प्रश्न विचारत आहेत. राहुलचा पहिला प्रश्न…
राहुल गांधी : आजकाल काय चाललंय भाऊ?
अदानी मुखवटा घातलेला खासदार: आजकाल मी जे काही बोलतो ते करतो.
राहुल गांधी : तुम्ही पुढे काय करण्याचा प्रयत्न करत आहात?
अदानी मुखवटा घातलेला खासदार: मला काहीही हवे आहे. विमानतळ हवे… काहीही हवे.
अदानी मुखवटा घातलेला खासदार: मोदींचा मुखवटा घातलेल्या खासदाराच्या पाठीवर थाप मारली… आज संध्याकाळी आमची सभा आहे. हा भाऊ आमचा आहे.
राहुल गांधी : ते खूप गंभीर दिसतात, आजकाल ते कमी बोलतात.
अदानी मास्क घातलेले खासदारः सध्या ते थोडे टेन्शनमध्ये आहेत.
राहुल गांधी : तुमची भागीदारी किती दिवसांपासून सुरू आहे?
मास्क घातलेले खासदार : मोदी मास्क घातलेल्या खासदाराचा हात धरून ते म्हणाले- वर्षानुवर्षे.
व्हिडिओनंतर भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल Rahul Gandhi ।
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजप खासदार दिनेश शर्मा यांनी, “आज ज्येष्ठ नेते मास्क घालून संसदेत उभे आहेत आणि पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरतात… त्यांना देशाच्या लोकशाहीचा आदर कसा करावा हेच कळत नाही… काँग्रेस आता हताश, निराश, थकली आहे. अस्तित्वात नसलेल्या नेत्यांचा गट तयार झाला असून त्यांच्याशी संबंधित विरोधी पक्षही हळूहळू वेगळे होत आहेत. त्यांना देशातील उद्योगपती नको आहेत, परदेशातील उद्योगपती हवे आहेत. त्यांना जॉर्ज सोरोस हवा आहे जो भारतात अस्थिरता निर्माण करणारा ठरणार आहे” असे म्हणत काँग्रेसवर टीका केली.





