पुणे : इसवी सन १७०३ मध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जिंकण्यासाठी स्वत: आलेल्या औरंगजेबाला जेरीस आणलेल्या वीर संताजी हैबतराव शिळीमकर यांच्या ३२० वी पुण्यतिथी निमित्ताने हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठाणच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. भोरा तालुक्यातील तांभड येथे त्यांच्या समाधीस्थळी प्रतिष्ठाणच्या वतीने समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ तसेच प्रतिष्ठाणचे सदस्य तसेच शिळीमकर परिवारीत सदस्य उपस्थित असल्याचे प्रतिष्ठणचे अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर यांनी सांगितले. इतिहास संशोधक सचिन खोपडे, वंशज राजेंद्र शिळीमकर , किरण व सचिन शिळीमकर( कुरूंगवडी), राजेंद्र व अमोल शिळीमकर (तांभआड), मंगेश व योगेश, विश्वजित शिळीमकर (करंदी कांबळे) यांच्यासह प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.
१७०३ मध्ये स्वत: औरंगजेबाने राजगडावर हल्ला चढविला होता. त्यावेळी राजगड लढविण्याची जबाबदारी होती. यावेळी झालेल्या लढाईत हैबतराव शिळीमकर आणि महिपतरराव शिळीमकर यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने औरंगजेबावर तोफांचा हल्ला करून त्याला जेरीस आणले होते. मात्र, या लढाईत मोगलांच्या बाजूने सुरू असलेल्या तोफगोळयांच्या मार्यात एका गोळयाने बेसावध असलेल्या संताजी शिळीमकर यांचा वेध घेतला. त्यात, त्यांना वीरगती प्राप्त झाली.