प्रभात वृत्तसेवा पुणे – दमानिया यांनी त्यांना या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अनुभवांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, आधीचे राजकारणी लोकसेवेसाठी राजकारणात येत होते. आता ते टक्केवारीसाठी येतात. मी जेव्हा एखादा घोटाळा बाहेर काढते तेव्हा समाज, जात बघत नाही. मला कोणी कागद देत नाही, माझ्याकडे तीच माहिती असते जी तुमच्याकडे आहे. मला फक्त त्यातले घोटाळे शोधता येतात. वारे यांनीही यावेळी त्यांना जिल्हा परिषद शाळा चालवताना आलेल्या अडचणींची माहिती दिली आणि त्यावर मात करण्यासाठी आरटीआयचा केलेला वापर यावरते बोलले. आरटीआय सर्वसामान्यांना सक्षम करतो, असे ते म्हणाले. आरटीआय कोमात.. माहिती अधिकार कायदा (आरटीआय) कोमात गेला असला तरी तो अद्याप मेलेला नाही. त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते आणि आपचे नेते विजय कुंभार यांनी केले. आरटीआयला रविवारी २० वर्ष पूर्ण झाल्याने आरटीआय कट्टाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया, माजी आयएएस अधिकारी महेश झगडे आणि प्रसिद्ध शालेय शिक्षक दत्तात्रय वारे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी माहिती अधिकार कायदा, त्यामुळे समोर आलेले घोटाळे आणि कायद्यातील बदलांवर चर्चा केली.कुंभार म्हणाले की, राज्यकर्त्ये हे नेहमीच भ्रष्ट होते. आधीचे राजकारणी चमच्याने खात होते आताच्यांनी पातेलं तोंडाला लावलं आहे. सध्या आरटीआयची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, आतापर्यंत आपण गाफील राहिलो. मात्र, आरटीआयची खरी ताकद कलम ४ मध्ये आहे. त्यानुसार प्रशासनाला माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. झगडे म्हणाले की, विरोधी पक्षांसोबत नागरी दबाव गट देखील घटले आहेत. ते वाढवण्याची आवश्यकता आहे. आरटीआय हा लोकशाहीचा प्राणवायु आहे. सध्या परिस्थिती भयानक आहे, कायद्याला हळूहळू संपवल जातंय. यात राजकारण्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग जास्त आहे. या कायद्याच्या घेऱ्यात आता राजकारण्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणण्याची गरज आहे.