जुन्नर : जुन्नरमध्ये येऊन काही नेते तालुक्यातील पाण्याचे चौथ्या सुप्रमामध्ये फिर नियोजन करून करमाळ्याच्या मागीला पाणी घेऊन जाणार असल्याची भाषा करतात. परंतु मी जिवंत असेपर्यंत जुन्नरच्या हक्काच्या पाण्याला हात लावू देणार नाही, असा इशारा महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथे झालेल्या प्रचार सभेत सांगितले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, संजय काळे, सूर्यकांत ढोले, काळूराम शिळकंदे, मारुती वायाळ, पांडुरंग पवार, उज्ज्वला शेवाळे आदी मान्यवर व आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार बेनके म्हणाले की, 2018 मध्ये तिसरी सुप्रमा झाली त्यामध्ये माणिकडोह परिसरात बुडीत बंधारे करू नये तसेच नेतवडचा बंधारा वगळण्यात आला; परंतु जामखेडच्या तीन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी आमदार कोण होते? असा सवाल त्यांनी माजी आमदारांना विचारला. बेनके म्हणाले की, आपल्याला अणे पठारावर पाणी न्यायचे, कोपरे मांडवे येथे द बंधारा बांधायचा, चिल्हेवाडी पाइपलाइनचे काम, वडज उपसा जलसिंचनाचे काम पूर्ण करायचे असल्याचे बेनके यांनी नमूद केले. दुर्गम भागात डोंगरदर्यामध्ये निसर्गाचे संरक्षण करणार्या आदिवासी बांधवांचा अधिक विकास केला पाहिजे, अशी शिकवण स्व. वल्लभ बेनके यांनी दिली आहे. आदिवासी समाजात ज्यावेळी घुसखोरी होत होती, त्यावेळी घुसखोरी होऊ दिली जाणार नसल्याची भूमिका बेनके यांनी घेतली होती. आदिवासी समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली असून समाजाला वार्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली. प्रश्न विचारला की खासदारांना… महाविकास आघाडीच्या उमेदवाराला माझे आवाहन आहे की जुन्नरच्या विकासासाठी आपल्याकडे काय व्हिजन आहे. दगड उभा केला असे सांगितले जाते; परंतु दगड आम्हाला चालणार नाही. कोणताही प्रश्न विचारला की खासदारांना विचारून सांगतो असे सांगितले जात, असा उमेदवार तालुक्याला चालणार नाही.