पुणे(प्रतिनिधी) : कोरेगाव भिमा येथे शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे 15 लाख भिम अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ( सोमवारी) विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.
सुनिल माने, जितेंद्र गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, निर्भय प्रतीष्ठानचे निखिल गायकवाड, आयुष आंबेडकरी युवा मंचचे सुनिल धतराज व सहकारी, स्वच्छ संस्थाचे चेतन हरनामे व कर्मचारी, आधार पुनावालाचे मल्हार करवंदे, नागेश पवार व सहकारी, पथारी संघटनेचे विजय कांबळे, संदीप चाबुकस्वार तसेच पेरणे ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश ठोंबरे आदींसह विविध जणांनी सहभाग घेतला.
या स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
तसेच गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनां सहभागी होत आहेत.