Keshav Upadhyay’s post : आज ८ अॅाक्टोबर रोजी बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खरंतर या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील असे नावे देण्यात यावे, यासाठी मोठा संघर्ष सुरू होता. अखेर सरकारने या नावावर शिक्का मोर्तेब केला आहे. अशातच भाजपने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विमानतळाच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा हट्ट धरून बसले होते, असाही आरोप केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विमानतळाच्या नावावर राजकारण तापलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवरून पोस्ट लिहित हे आरोप केले आहेत. आज होणारे विमानतळाचे उद्घाटन हे जसे भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेच उदाहरणे आहे, तसेच ते कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाचे, अपयशाचे, विकासविरोधी धोरणाचे ढळढळीत उदाहरण आहे. अर्थात उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही विमानतळाच्या कामात अडथळेच आले, कारण त्यावेळी विमानतळाच्या… — Keshav Upadhye (@keshavupadhye) October 8, 2025 या पोस्टमधून काँग्रेसवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन २८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. विकासाची जराही दृष्टी नसलेल्या काँग्रेस आघाडीचे सरकार १९९९ मध्ये राज्यात आले आणि हा प्रस्ताव अडगळीत पडला, अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे. तसेच देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर २०१७ मध्ये पुन्हा गती दिली, आणि देशातील सर्वात मोठे, साडेबावीस टक्क्यांचे पॅकेज भूमिपुत्रांना देऊन ज्यांच्या जमिनी जाणार त्यांनाही न्याय मिळवून दिला, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. केशव उपाध्ये यांची पोस्ट आज होणारे विमानतळाचे उद्घाटन हे जसे भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेच उदाहरणे आहे, तसेच ते कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाचे, अपयशाचे, विकासविरोधी धोरणाचे ढळढळीत उदाहरण आहे. अर्थात उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही विमानतळाच्या कामात अडथळेच आले, कारण त्यावेळी विमानतळाच्या कामापेक्षा त्याचे नामकरण करण्याची घाई उध्दव ठाकरेंना झाली होती. विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिकांचा प्रचंड आग्रह असताना उद्धव ठाकरे मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा हट्ट धरून बसले होते. सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार. ‘ज्याचे भूमीपूजन करतो त्याचे उद्घाटन सुध्दा करतो’ ही मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारची खासियत आहे. मुंबई विमानतळावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन २८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. विकासाची जराही दृष्टी नसलेल्या कॅाग्रेस आघाडीचे सरकार १९९९ मध्ये राज्यात आले आणि हा प्रस्ताव अडगळीत पडला. या विमानतळाच्या अडगळीत पडलेल्या प्रस्तावाला देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर २०१७ मध्ये पुन्हा गती दिली, आणि देशातील सर्वात मोठे, साडेबावीस टक्क्यांचे पॅकेज भूमिपुत्रांना देऊन ज्यांच्या जमिनी जाणार त्यांनाही न्याय मिळवून दिला. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली, पण त्यानंतर आलेल्या उध्दव ठाकरे सरकारच्या काळात पुन्हा या विमानतळाचे काम रखडले. पण त्यानंतर शिंदे व देवेद्रजी मुख्यमंत्री असताना या कामाने गती घेतली व आता आज याचे उद्घाटन होत आहे. हेही वाचा : Akshay Kumar: अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल: “संतरा तुम्ही सोलून खाता का रस काढून?”