गडचिरोली – पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. या चकमकीत कोणतीही जीवीत हाणी झाली नाही. भामरागड तालुक्यातील जंगलात ही घटना घडली आहे.
नक्षलवाद्यांचा विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव होता त्यांचा हा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. चकमकीनंतर पोलिसांनी शोधमोहीम घेतली असून यामध्ये
घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे.
घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून होते असे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी व कुकर बॉम्ब जागेवरच नष्ट करण्यात आले.
ही कामगीरी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी केली असून त्यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.
दरम्यान, विशेष अभियान पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे निर्देश दिले.